Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काळाच्या ओघात ‘पोटोण्डी’ पद्धत झाली बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

काळाच्या ओघात ‘पोटोण्डी’ पद्धत झाली बंद

admin
Last updated: 2025/05/30 at 4:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 30 मे, (हिं.स.) सोयाबीन उत्पादक हंगामाच्या बियाणांमध्ये वेळी उगवणक्षमता आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अनेक पद्धतीचा प्रयोग करीत होते. ‘पोटोण्डी’ ही त्यापैकी एक पद्धत ! ही पद्धत दहा-पंधरा वर्षापूर्वी चांगलीच प्रचलित होती. मात्र, सध्याच्या घडीला या पद्धतीचा कोणीच अवलंब करीत नाही. बदलत्या काळाच्या ओघात पोटोण्डी पद्धत बंद झाली असल्याचे दिसून येत आहे.

सध्या आवते व पन्हें भरण्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, शेतकरी पोटोण्डी पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत नाही. कृषी केंद्रावरून बियाणे घेऊन सरळ शेतावर नेऊन लगेच आवते आणि पन्हे भरणी शेतकरी करीत आहेत. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर शेतकरी आवते आणि पन्हे भरणीच्या जागेची मशागत करायचे. नंतर पावसाला सुरुवात झाली की घरीच साठवून ठेवलेल्या बियाणांमध्ये उगवणक्षमता आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी पोटोण्डी या पद्धतीचा प्रयोग करीत असत. पण आता काळ बदलला आहे. शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीचा शिरकाव झाल्यामुळे घरीच तयार केलेले बियाणे साठवून ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांची फसगत होते. कृषी केंद्रातून खरेदी केलेले बियाणे उगवलेच नाही, अशा तक्रारी अनेकदा कानावर येताना दिसत आहेत.

काय आहे पोटोण्डी पद्धत ?

पोटोण्डी पद्धतीत साठवून ठेवलेल्या बियाणांमधून ऑजळभर धान्ये काढून ते कापसाच्या बोळ्यामध्ये किंवा ओल्या गोणपाटामध्ये टाकले जायचे, नंतर तो कापसाचा बोळा किंवा गोणपाट छोटी टोपली किंवा पानापासून बनवलेल्या द्रोणात ठेवला जात असे. गरजेनुसार पाणी देण्यात येत होते. चार-पाच दिवसात या धान्याला अंकुर आले नाहीत तर या बियाणामध्ये उगवणक्षमता नाही, असे समजले जायचे, शेतकरी दुसऱ्या बियाणांची शोधाशोध करायचे.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article यंदा पहिल्या वर्गाला सीबीएसई पॅटर्नची पुस्तके
Next Article अकरावीकरिता ३,२०५ विद्यार्थ्यांची नोंदणी; प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?