Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

admin
Last updated: 2025/07/30 at 5:47 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, ३० जुलै – जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) नवीन अहवालात मोठा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार, हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या समर्थनाशिवाय शक्यच नव्हता.

Contents
टीआरएफने घेतली जबाबदारी, नंतर माघारटीआरएफ आणि लष्कर-ए-तैयबा यांच्यात थेट संबंधहल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यूभारताची ठोस कारवाई : ऑपरेशन सिंदूर

टीआरएफने घेतली जबाबदारी, नंतर माघार

संयुक्त राष्ट्रांच्या ISIL व अल-कायदा निगराणी समितीने सादर केलेल्या ३६व्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानातून कार्यरत असलेला ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या गटाने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी दोनदा घेतली होती. त्यांनी हल्ल्याच्या दिवशी घटनास्थळाचा फोटोही प्रसारित केला होता. मात्र, २६ एप्रिल रोजी त्यांनी अचानक ही जबाबदारी परत घेतली, आणि त्यानंतर TRF कडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

टीआरएफ आणि लष्कर-ए-तैयबा यांच्यात थेट संबंध

अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की टीआरएफ आणि लष्कर-ए-तैयबा यांच्यात थेट संबंध आहेत, आणि या हल्ल्यासाठी लष्करचा पाठिंबा अत्यावश्यक होता. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने TRF ला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अमेरिकेने याच महिन्यात TRF वर अधिकृत बंदी लागू केली.

हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू

या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी २५ भारतीय तर १ नेपाळचा नागरिक होता. पाच दहशतवाद्यांनी पहलगाम या पर्यटनस्थळी हल्ला केला होता, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

भारताची ठोस कारवाई : ऑपरेशन सिंदूर

हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित करून कारवाई केली होती. ही मोहीम भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेचा भाग होती.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
Next Article आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा

Latest News

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?