Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जेव्हा भारताने पाणी सोडले तेव्हा मृतदेह तरंगत आले- पाक संरक्षणमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जेव्हा भारताने पाणी सोडले तेव्हा मृतदेह तरंगत आले- पाक संरक्षणमंत्री

admin
Last updated: 2025/08/29 at 5:49 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

इस्लामाबाद, २९ ऑगस्ट. भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यासोबत मृतदेह, जनावरं आणि मोठ्या प्रमाणावर मलबा पाकिस्तानमध्ये वाहून आला आहे, असे विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केले. पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यावर असताना ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी हे विचित्र विधान केलं आहे.

पाकिस्तानच्या पंजाब, सियालकोट आणि इतर भागांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यावर असताना आसिफ यांनी म्हटलं की, भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यासोबत मृतदेह, जनावरं आणि मोठ्या प्रमाणावर मलबा पाकिस्तानमध्ये वाहून आला आहे. त्यांनी असंही सांगितलं की, हा मलबा स्थानिक प्रशासनाच्या मदत कार्यात अडथळा निर्माण करत आहे. आसिफ यांनी पुढे म्हटलं की, सियालकोट हे जम्मू भागातून येणाऱ्या जलमार्गांच्या खाली स्थित आहे आणि जेव्हा जेव्हा भारत पाणी सोडतो, तेव्हा तिथे नियंत्रितपणे पूर येतो. मात्र, त्यांनी हे देखील मान्य केलं की भारताने नद्यात पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला दोन वेळा माहिती दिली होती.

ख्वाजा आसिफ यांचं हे विधान पाकिस्तानी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आणि म्हटलं की, सरकार आपली अपुरी तयारी आणि ढासळलेली पायाभूत रचना झाकण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. काही लोकांनी उपरोधाने लिहिलं की “पूर पाण्याने येतो, लाशांनी नाही.” हा वाद अशा वेळी उभा राहिला आहे जेव्हा भारत-पाकिस्तानमधील सिंधू जल करार आधीच स्थगित झालेला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश जलसंबंधी माहितीची देवाणघेवाण करायचे, पण एप्रिल २०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ही देवाणघेवाण थांबवली. तरीही, भारताने लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानला खराब हवामान आणि संभाव्य पूर यासंबंधी माहिती दिली होती.

पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १२ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून सुमारे २.५ लाख लोक विस्थापित झाले आहेत. जवळपास १,४३२ गावे पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, व्यवसाय ठप्प झाले आहेत आणि हजारो कुटुंबं मदत छावण्यांमध्ये राहायला भाग पडली आहेत. सरकारने ७०० मदत छावण्या आणि २६५ वैद्यकीय छावण्या उभारल्या आहेत, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

पाकिस्तानी सिंचन विभागाच्या मते, ३८ वर्षांनंतर प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकत्रितपणे धोक्याच्या पातळीवर आल्या आहेत. यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लष्कर आणि मदत पथकांनी २४ तास आपत्ती व्यवस्थापनाचे अभियान सुरू केले आहे.

You Might Also Like

इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले

ऍड. राकेश किशोर यांची तात्पुरती नोंदणी रद्द

पंजाबमध्ये बब्बर खालसा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

पंतप्रधान मोदींनी मुंबईत ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांची घेतली भेट

केदारनाथने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला; भाविकांची संख्या १६.५६ लाखांवर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत मराठा मोर्चामुळे वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचे हाल
Next Article तुम्ही मोदींसाठी जितके अपशब्द वापराल, तितकं कमळ अधिक फुलत जाईल – अमित शाह

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?