इंदोर , 30 मे (हिं.स.)।पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केली.या ऑपरेशनसंदर्भात भाजपचे माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी आता विधान केले आहे. “दहशतवाद्यांनी नव्हे, तर पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांनी नाव आणि धर्म विचारून हिंदुंना मारले.”असे विधान आता प्रज्ञा ठाकूर यांनी केले आहे.
माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर म्हणाल्या की, “मुस्लिमांनी हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. यामुळे ऑपरेशन सिंदूर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे. हिंदू धर्मात “सिंदूर” हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी पहलगाममध्ये महिलांचे कुंकू (सिंदूर) पुसले. त्यामुळेच याचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आल. पाकिस्तान आणि मुस्लिमांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. “मुस्लिमांनी हिंदूंवर केलेले हल्ले आपण फक्त दहशतवादी हल्ले, हत्याकांड म्हणू. जर असे हल्ले झाले तर हिंदूंनीही मुस्लिमांवर हल्ला केला पाहिजे आणि मुस्लिमांनी दहशतवाद्यांवर हल्ला केला पाहिजे. हा आमचा आग्रह असल्याचे ठाकूर म्हणाल्यात. पहलगाम हल्ला एक अतिशय भयावह आणि हृदयद्रावक घटना आहे. ज्यांनी या हत्या केल्या भारत त्यांना सोडणार नाही. हे लोक जेथे पाळले-पोसले जातात, त्या देशालाही भारत सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानात सर्वच दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण ते मुस्लिम म्हणून भारतात आले आणि हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारले. त्यांनी मुस्लिमांना मारले नाही. ते ठरवून आले होते. जर कुणी मुस्लीम आहे, असं खोटं सांगितलं, तर त्यांना कलमा म्हणायला लावला आणि ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांना देखील मारल्याचे ठाकूर म्हणाल्या.