Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कृषीमंत्री दादा भुसेंचे भाषण सुरु असतानाच मंडप कोसळला, मोठा अनर्थ टळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

कृषीमंत्री दादा भुसेंचे भाषण सुरु असतानाच मंडप कोसळला, मोठा अनर्थ टळला

Surajya Digital
Last updated: 2022/04/21 at 6:47 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

हिंगोली : कृषीमंत्री दादा भुसे यांचे भाषण सुरु असतांना मोठा अनर्थ टळला आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान भुसे भाषण करत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हवा आली आणि त्यामुळे स्टेजच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळल्याची घटना घडली. भाषणादरम्यान मंडप उडाल्याने नागरिक घाबरले होते. परंतू कृषीमंत्र्यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला.

आज दादाजी भुसे यांनी औंढा शहरालगत असलेल्या जिंतूर पॉईंटवर विकेल ते पिकेल या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर दादा भुसे गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी उपस्थित असल्याने या कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन दादा भुसे यांनी एका महिला शेतकऱ्यांच्या हस्ते केले.

दादाजी भुसे यांचे भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात हवा आली आणि त्यामुळे स्टेजच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्या मंडपाखाली कोणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. भाषणादरम्यान मंडप उडाल्याने नागरिक घाबरले होते. परंतू कृषीमंत्र्यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला.

डाव्या बाजूकडील मंडप कोसळताच नागरिक आणि महिला चांगल्याच घाबरल्या होत्या, या महिलांना धीर देण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी हवा निघून गेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका असं म्हटलं आणि सर्वजण शांत झाले. मात्र, हवा मोठ्या प्रमाणात असल्याने ज्या मंडपात कार्यक्रम सुरु होता तो मंडप सुद्धा कोसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

As the speech of Agriculture Minister Dada Bhuse started, the pavilion collapsed and a big disaster was averted

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दादा भुसे कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी महिलांशी संवाद साधत होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर हवा आली आणि या हवेत स्टेजच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळला. सुदैवाने मंडपात नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मंडप कोसळला मात्र, सुदैवाने या मंडपात एकही नागरिक नव्हता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, हवा मोठ्या प्रमाणात असल्याने ज्या मंडपात कार्यक्रम सुरु होता तो मंडप सुद्धा कोसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कार्यक्रमात बसलेल्या महिला शेतकरी घाबरल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत भाषण सुरु असतानाच दादा भुसे यांनी सर्वांना आश्वासित केले की हा मंडप पडणार नाही. हवा निघून गेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. त्यानंतर मंडपात बसलेल्या महिलांनी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु स्टेजच्या डाव्या बाजूला कोसळलेल्या मंडपात जर नागरिक बसलेले असते तर मोठा अनर्थ झाला असता.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र याला दादा भुसेंनी नौटंकी म्हणत टीका केली आहे.

https://www.facebook.com/109399567404448/posts/525369879140746/

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #speech #Agriculture #Minister #DadaBhuse #started #pavilion #collapsed #disaster #averted, #कृषीमंत्री #दादाभुसे #भाषण #मंडप #कोसळला #अनर्थ #टळला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपुरातील युवकाची अकलूजमध्ये जावून आत्महत्या
Next Article सर्वाधिक राष्ट्रध्वज फडकावून शनिवारी मोडणार पाकिस्तानचा विश्व विक्रम

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?