इंदापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे हक्काचे पाणी मिळते ते पाणी इंदापूर तालुक्यातील शेतकरी कधीही पळवणार नाहीत. परंतु ज्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्याचा हक्क नाही ते पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला मिळाले असताना,चुकीचा विरोध करून पाणी रोखले आहे,व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संसारात विष कालण्याचे काम सोलापूरच्या काही स्वार्थी लोकांनी केले आहे. त्यांना उजनी धरणातून बेकायदेशीर एक पाण्याचा थेंब देखील शेतकरी जाऊ देणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिला.
ब्लॅक फंगसचा कहर; 5500 प्रकरणं आली समोर, देशात आतापर्यंत 126 लोकांचा मृत्यू, 70 टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रातhttps://t.co/oYN9bZVS2P
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी इंदापूर – बारामती रस्त्यावर तरंगवाडी येथे काळ्या पट्ट्या बांधून रस्ता रोको करत सोलापूरच्या त्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी हा इशारा दिलाय.
तीन दिवस एसबीआयची यूपीआय व इंटरनेट बँकिंग सेवा राहणार बंद #bank #SBI #upi #3day #एसबीआय #INTERNET #banking #युपीआय #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/p1HK3HY9T2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
तालुक्यातील ६० हजार एकर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. उजनीतून इंदापूरकरांना पाणी देण्यास विरोध करणारे सोलापूरातील लोकप्रतिनीधी उजनीतून बोगस पाणी पळवित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सोलापूरकरांना नदीतून देण्यात येणारे पाणी बंद पाडण्यात येणार आहे याशिवाय आम्ही न्यायालयात आमच्या हक्क्याच्या पाण्यासाठी लढा देणार असल्याचे इंदापूरकर म्हणाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनी धरणातून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिंधीनी विरोध केल्याने सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून पाण्याची तरतूद नसल्याने एकही थेंब जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून देण्यात आलेले पाणीही बंद पाडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी दिला आहे. इंदापूरात कळस येथे चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात https://t.co/2I5sAhhTKW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
यावेळी पाटील म्हणाले, उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे पाणी आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. मात्र सोलापूरला अॉक्टोबरनंतर अनाधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणीही बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबईकरांचा कचरा निसर्गाने परत दिला, 4 दिवसात सुमारे 153 मेट्रिक टन कचरा #mumbai #waste #surajyadigital #nature #सुराज्यडिजिटल #4day pic.twitter.com/vSJQOoNpv3
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
* ताटात वाढलेला घास परत घेण्यासारखा प्रकार
खडकवासला धरणसाखळीतील पाणी पुण्याच्या वाढत्या पाणी मागणीमुळे आम्हाला पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. परंतू त्यांनी वापरलेल्या पाण्यापैकी सुमारे ८० टक्के सांडपाणी हे भिमा नदीत येत आहे. हेच सांडपाणी आम्ही शेतीसिंचनासाठी मागणी करत आहोत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाठपुरावा करुन शेटफळगढे उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र जलसंपदा मंत्र्यांनी हीच सिंचन योजना रद्द करत असल्याचे जाहीर केले. हा प्रकार म्हणजे ताटात वाढलेला घास परत घेण्यासारखा आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी लक्ष्मण झगडे, डॉ.दादाराम झगडे,विजय झगडे तुकाराम अभंग, सचिन अभंग,नीरज झगडे,गणेश झगडे, तुकाराम करे,बजरंग राऊत, राजाराम तरंगे, माऊली शिंदे, गोखळी चे सरपंच बापू पोळ,उपसरपंच सचिन तरंगे, तरंगवाडी चे उपसरपंच आप्पा शिंदे, सरपंच कांतीलाल बुनगे,बापू पारेकर, शिवराज गावडे, आजिनाथ तरंगे, अण्णा शेंडगे, कांतीलाल तरंगे यांच्यासह शेतकरी या आंदोलनात सामील झाले होते.
कमाईची सुवर्णसंधी; मोदी सरकार शेती सोलार पॅनलला देणार पैसे, नापीक जमीन शेतकर्यांच्या उत्पन्नाचे स्रोत होणार
https://t.co/4Wde5vG4sd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
* निर्णय पूर्ववत करा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी आणण्याचा निर्णय झालेला होता. मात्र सोलापूर करांनी चुकीचा विरोध केला, त्यामुळे ही योजना थांबली आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत या निर्णयामुळे गेलेला आहे. त्यामुळे जो निर्णय पाच टीएमसी पाणी देण्याचा झालेला होता तो पूर्ववत करावा, अशी मागणी तमाम शेतकरी बंधूंची आहे अशीही माहिती कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच; ऑनलाइन की ऑफलाइन ? https://t.co/cpxFtupAX4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021