Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो- पंतप्रधान मोदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो- पंतप्रधान मोदी

admin
Last updated: 2025/09/14 at 4:18 PM
admin
Share
2 Min Read
Oplus_16908288
SHARE

दिसपूर, 14 सप्टेंबर। “मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो,” असे विधान करत पंतप्रधान मोदींनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी दरांगमध्ये आयोजित जनसभेत ते बोलत होते.

आसामच्या दरांगमध्ये आयोजित जनसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच आसाममध्ये आलो आहे. आई कामाख्येच्या आशीर्वादामुळे ऑपरेशन सिंदूरला प्रचंड यश मिळाले. मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो. पण जेव्हा कोणाच्या आईचा, देशाच्या गौरवाचा अपमान होतो, तेव्हा ते मी सहन करू शकत नाही.”

पंतप्रधानांनी भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसवर हल्ला चढवत म्हणाले, “तुम्हीच मला सांगा की, भूपेनदांना भारतरत्न देण्याचा माझा निर्णय बरोबर होता की नाही? आणि काँग्रेसने त्यांचा केलेला अपमान बरोबर होता की चूक?”

पंतप्रधानांनी आरोप केला की काँग्रेसने मतबॅंकेच्या राजकारणासाठी योजनाबद्ध रीतीने घुसखोरी घडवून आणली. त्यांनी सांगितले की, असममधील हेमंता बिस्वा सरमा सरकारने लाखो एकर जमीन घुसखोरांपासून मुक्त केली आहे.

जनसभेत पंतप्रधानांनी लोकांना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. आसामच्या विकासावर भाष्य करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे आणि आसाम हा भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आज असम 13% विकास दरासह उल्लेखनीय प्रगती करत आहे.”

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.

You Might Also Like

निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार

तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी

ट्रम्प यांनी अँटीफा या संघटनेला “प्रमुख दहशतवादी संघटना” म्हणून केले जाहीर

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटी; सात जण बेपत्ता तर दोघांची सुटका

निवडणूक आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जागतिक कुस्ती स्पर्धा : कुस्तीपटू अमन सेहरावत वजनामुळे अपात्र
Next Article नेपाळ हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार;मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची भरपाई

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?