Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो- पंतप्रधान मोदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो- पंतप्रधान मोदी

admin
Last updated: 2025/09/14 at 4:18 PM
admin
Share
2 Min Read
Oplus_16908288
SHARE

दिसपूर, 14 सप्टेंबर। “मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो,” असे विधान करत पंतप्रधान मोदींनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी दरांगमध्ये आयोजित जनसभेत ते बोलत होते.

आसामच्या दरांगमध्ये आयोजित जनसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच आसाममध्ये आलो आहे. आई कामाख्येच्या आशीर्वादामुळे ऑपरेशन सिंदूरला प्रचंड यश मिळाले. मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो. पण जेव्हा कोणाच्या आईचा, देशाच्या गौरवाचा अपमान होतो, तेव्हा ते मी सहन करू शकत नाही.”

पंतप्रधानांनी भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसवर हल्ला चढवत म्हणाले, “तुम्हीच मला सांगा की, भूपेनदांना भारतरत्न देण्याचा माझा निर्णय बरोबर होता की नाही? आणि काँग्रेसने त्यांचा केलेला अपमान बरोबर होता की चूक?”

पंतप्रधानांनी आरोप केला की काँग्रेसने मतबॅंकेच्या राजकारणासाठी योजनाबद्ध रीतीने घुसखोरी घडवून आणली. त्यांनी सांगितले की, असममधील हेमंता बिस्वा सरमा सरकारने लाखो एकर जमीन घुसखोरांपासून मुक्त केली आहे.

जनसभेत पंतप्रधानांनी लोकांना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. आसामच्या विकासावर भाष्य करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे आणि आसाम हा भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आज असम 13% विकास दरासह उल्लेखनीय प्रगती करत आहे.”

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जागतिक कुस्ती स्पर्धा : कुस्तीपटू अमन सेहरावत वजनामुळे अपात्र
Next Article नेपाळ हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार;मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची भरपाई

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?