Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातील प्रश्न संसदेत तब्बल दहा वर्षानंतर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातील प्रश्न संसदेत तब्बल दहा वर्षानंतर

admin
Last updated: 2024/07/25 at 6:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 25 जुलै (हिं.स.)। बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातील प्रश्न संसदेत तब्बल दहा वर्षानंतर खा. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. मात्र प्रत्यक्षात ही योजना कधी सुरू होणार, असा प्रश्न या भागातील जनतेमधून विचारला जात आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीवर 22 गावांनी बहिष्कार टाकल्यानंतर या भागातील शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिक चर्चेत आला. त्यानंतर तत्कालीन आ. स्व. भारत भालके यांनी यासंदर्भात पाठपुरावा करत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळवली. मात्र राज्यात व देशात सत्ता बदल झाल्याने या योजनेचे चित्र बदलले 2014 साली खा. झालेल्या शरद बनसोडे यांनी लोकसभेत पहिल्यांदाच या गावाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला मात्र त्यानंतर या योजनेच्या संदर्भात केंद्रस्तरावरून कोणताही पाठपुरावा अगर हालचाल झाली नाही

तो प्रश्न राज्य पातळीवरच घुटमळत राहिला. त्यामध्ये प्रस्तावातील त्रुटी, फेर सर्वेक्षण, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, सुधारित मान्यता, डी पी आर, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून हा प्रस्ताव राज्य पातळीवर सरकत राहिला, तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या निधीतून या योजनेचा प्रश्न मार्गी लावतो असा शब्द दिला होता. मात्र, त्याची पूर्ती झाली नाही. परंतु आ.समाधान आवताडे यांनी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यास मात्र बाजी मारली यापूर्वीचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पाणी प्रश्नाकडे ढुंकून देखील बघितले नाही. त्यामुळे त्याचा फटका सत्ताधारी पक्षाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसला. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपून आता विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची वेळ आली.

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – चार लाख ९२ हजार ८४५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या
Next Article महाराष्ट्र राज्य युवक संचालक क्रीडा स्पर्धेची  तालुकास्तरीय बैठक संपन्न

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्र July 15, 2025
टेस्लाचे स्मार्ट एसयूव्ही मॉडेल Y भारतात लाँच; किंमत ५९. ८९ लाखांपासून सुरू
देश - विदेश July 15, 2025
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार – प्रताप सरनाईक
देश - विदेश July 15, 2025
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
देश - विदेश July 15, 2025
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी १ ऑगस्टपासून मुंबईत धावणार
महाराष्ट्र July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?