Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून ‘धुलाई’ झालेला प्रियकर दुस-यादिवशी झाला त्या घरचा ‘जावई’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून ‘धुलाई’ झालेला प्रियकर दुस-यादिवशी झाला त्या घरचा ‘जावई’

Surajya Digital
Last updated: 2020/11/23 at 8:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : प्रेयसीला रात्री भेटायला गेल्यावर तिच्या कुटुंबीयांच्या तावडीत सापडल्यावर प्रियकराची काय आरती होणार आहे का, नाही यथेच्छ धुलाईच होणार आहे. झालेही असेच पण उत्तर प्रदेशात एका प्रेमप्रकरणाचा शेवट गोड झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रेयसीला रात्री तिच्या घरी भेटायला गेलेला प्रियकर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सापडतो आणि सकाळी तो त्या घराचा जावई बनतो. चित्रपटात शोभावी, अशी ही घटना उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये घडली आहे. रामपूरमध्ये रात्री प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सापडतो. त्याला बघून संतप्त झालेले प्रेयसीचे कुटुंबीय रात्रभर त्याला बेदम मारहाण करतात.

त्यानंतर सकाळी पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येते. त्यानंतर मारहाणीचा खटला दाखल होण्याची भीती असल्याने काहीजण समझौत्यासाठी पुढाकार घेतात आणि त्यामुळे रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून धुलाई झालेला प्रियकर त्या घराचा जावई बनतो, अशा प्रकारे या प्रेमप्रकरणाचा शेवट गोड झाला आहे.

स्वारमधील नगली गावातील तरुणाचे सुमालीतील लक्ष्मीसोबत प्रेमसंबंध होते. तो तिला भेटण्यासाठी नेहमी तिच्या घरी जात होता. मात्र, शुक्रवारी तो मध्यरात्री तिला भेटायला गेला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले. मुलीच्या खोलीत तिचा प्रियकर सापडल्याने संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाची रात्रभर धुलाई केली. घरातील आरडाओरडा ऐकून आजूबाजुचे शेजारीही जमा झाले. त्यांनीही त्या प्रियकराला रात्रभर झोडपले. त्यानंतर सकाळी पोलिसांना बोलवण्यात आले.

* खटला, मानहाणीमुळे झाला समझौता

प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यावर तरुणाच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांविरोधात मारहाणीचा खटला दाखल करण्याचा विचार केला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. मारहाणीचा खटला दाखल होण्याची आणि बदनामीची भीती असल्याने दोन्ही पक्षांमध्ये समझौत्यासाठी काहीजणांनी पुढाकार घेतला. त्यांच्यात चर्चा करण्यात आली.
मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळील एका मंदिरात दोघांचे लग्न करण्यात आले. रात्रभर मुलीच्या कुटुंबीयांकडून धुलाई झालेला तरुण सकाळी त्याच घराचा जावई बनला होता आणि प्रेमप्रकरणाचा शोवट गोड झाला.

You Might Also Like

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी

फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना

शशी थरूर यांनी श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींच्या अटकेवर चिंता व्यक्त केली

 युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की पुतिनसोबत चर्चासाठी तयार; शांतता प्रयत्नांवर भर

“राष्ट्रीय हितांवर कोणतीही तडजोड नाही” – जयशंकर यांचा अमेरिकेशी चर्चेसंदर्भात स्पष्टीकरण

TAGGED: #रात्रभर #प्रेयसीच्याकुटुंबीयांकडून #धुलाई #प्रियकर #दुस-यादिवशी #त्याघरचा #जावई'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश; पुन्हा सरकार पडण्याचे केले भाकीत
Next Article वाढत्या कोरोना संसर्गामुळे पंतप्रधान मोदींनी बोलावली उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?