Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणेकरांना दिलासा : पाणीकपात टळली; संततधार पावसामुळे चार धरणात 62.21 टक्के पाणीसाठा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

पुणेकरांना दिलासा : पाणीकपात टळली; संततधार पावसामुळे चार धरणात 62.21 टक्के पाणीसाठा

Surajya Digital
Last updated: 2020/08/11 at 8:05 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुणेकरांची तहान भागवणाऱ्या धरण साठ्याच्या क्षेत्रात संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याची पातळी वाढली आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा आहे.

संततधार पावसानं चारही धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये आतापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21 % टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे.   गेल्या वर्षीच्या 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्क्याच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण भरल्यास जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. जुलै महिन्यात पाणी साठा कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसानं दिलासा मिळाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुण्यातील स्थलांतरित लोकसंख्या साधारण 52 लाख आहे. एवढ्या लोकसंख्येला महिन्याला दीड टिएमसी पाणीपुरवठा लागतो. त्यामुळे पिण्याची पाण्याची चिंता मिटली, तरी शेतीच्या पाण्याची समस्या मिटण्यासाठी धरण 100 टक्के भरणं आवश्यक आहे.  हवामान विभागाने पुढील 6 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शहर परिसर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

* चार धरणात 62.21 टक्के पाणीसाठा

– खडकवासला 1.87 टीएमसी म्हणजेच 94.79 टक्के पाणीसाठा आहे.

– पानशेत 7.35 टीएमसी म्हणजेच 69 टक्के जलसाठा.

– वरसगाव धरणात 7.33 टीएमसी म्हणजेच 57.17  टक्के जलसाठा,

– टेमघर धरणात 1. 59 टीएमसी म्हणजे   42.80  टक्के आहे.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #पुणेकरदिलासा #पाणीकपात #चारधरण #जलसाठा #संततधारपाऊस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांतसिंहच्या प्रकरणात खासदार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा
Next Article श्रीमंत दगडूशेठचा गणेशोत्सव मंदिरामध्येच साजरा होणार; गणरायाचे यंदा ऑनलाईन दर्शन आणि आरती

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?