अमृतसर , 13 मे (हिं.स.)।पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजिठातील भुल्लर, टांगरा, आणि सांधा या गावांमध्येही विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मृतांपैकी अनेकजण गावातील विटभट्टीवर काम करणारे कामगार आहेत. या घटनेनंतर कारवाई करत पंजाब पोलिसांनी बनावट दारू पुरवणाऱ्या मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अमृतसर एसएसपी मनिंदर सिंग यांनी सांगितले की, परिसरात विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. एसएसपी म्हणाले, “आम्हाला सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास माहिती मिळाली की विषारी दारू पिऊन लोक मरत आहेत. आम्ही ताबडतोब कारवाई केली आणि चार जणांना ताब्यात घेतले. आम्ही मुख्य पुरवठादार प्रभजीत सिंगला अटक केली आहे.” याशिवाय मुख्य आरोपीचा भाऊ कुलबीर सिंह उर्फ जग्गू, साहिब सिंह उर्फ सराई, गुरजंत सिंह आणि जीताची पत्नी निंदर कौर यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १०५ बीएनएस आणि ६१अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर पंजाब सरकारने कारवाई केली आहे. विषारी दारू प्यायल्याने या लोकांचे आरोग्य बिघडले आहे.त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरात सुरू असलेल्या बनावट दारू व्यापाराची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत, तर मजिठा प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.