Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

admin
Last updated: 2025/06/12 at 6:36 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नागपूर, 12 जून (हिं.स.) : राहुल गांधी यांना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधानांना कुणीही पत्र पाठवू शकतो. परंतु, त्याबद्दल बोलणे आवश्यक वाटत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात गुरुवारी भाजप सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली, यावेळी गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारच्या कामगिरीबद्दल सांगितले. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपले मत मांडले.

राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधानांना पत्र लिहून वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी दलित, एसटी, ईबीसी, ओबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले आहे. वंचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीला होणारा विलंब दूर करण्याचे आवाहन राहुल यांनी केलेय.

राहुल यांच्या पत्राबद्दल गडकरींना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचाच पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही. मला याबद्दल काहीही बोलण्याची गरज नाही. लोकशाहीत कोणीही पंतप्रधानांना पत्र लिहू शकते. पण, राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्यावर भाष्य करणे योग्य वाटत नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीचे कौतुक केले. गडकरी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीए सरकारची 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा कार्यकाळ बदललेल्या देशात बदललेल्या सरकारचे नाही तर बदललेल्या युगाचे प्रतीक आहे. या कार्यकाळात, आपल्या देशाच्या समृद्धी, सुरक्षा, सामाजिक सौहार्द आणि सांस्कृतिक अभिमानाच्या चारही आयामांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व क्रांतिकारी बदल घडले आहेत असे गडकरींनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात

सोलापूर – काँग्रेस तालुकाध्यक्षावर गुन्हा

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर होणार निलंबन

रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्यजित पाटणकर भाजपात

सोलापुरात उजनी धरणात ७८.५३ टीएमसी पाणीसाठा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात २५ कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेबाहेर – रविंद्र चव्हाण
Next Article शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी

Latest News

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी
देश - विदेश June 13, 2025
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
महाराष्ट्र June 13, 2025
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर
देश - विदेश June 13, 2025
शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती
महाराष्ट्र June 13, 2025
शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
देश - विदेश June 13, 2025
इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता
देश - विदेश June 13, 2025
बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन
महाराष्ट्र June 13, 2025
सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात
सोलापूर June 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?