Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदी सरकारच्या काळात मोठ्या उद्योगपतींचाच विकास, तब्बल 23,78,76, 0000000 रुपयांची कर्जमाफी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

मोदी सरकारच्या काळात मोठ्या उद्योगपतींचाच विकास, तब्बल 23,78,76, 0000000 रुपयांची कर्जमाफी

Surajya Digital
Last updated: 2020/12/31 at 4:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या विकासाच्या मुद्यावर टीका केली आहे. मोदी सरकारच्या काळात विकास केवळ मोठ्या उद्योगपतींचाच झाला. काही उद्योगपतींची कर्जे या मोदी सरकारने माफ केली आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. मोदी सरकारने 23,78,76, 0000000 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपतींचे कर्ज माफ केले. या पैशात कोरोनामुळे संकटात आलेल्या कुटुंबियांची मदत करता आली असती. प्रत्येक कुटुंबियांना 20-20 हजार रुपये देता आले असते, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केलाय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षात उद्योगपतींचे 23,78,76, 0000000 कर्ज माफ केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात एवढ्या पैशातून देशातील 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20-20 हजार रुपये देता आले असते. मात्र, तसे घडले नाही. हाच मोदींच्या विकासाचा खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बुधवारच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. मोदी सरकारची आश्वासने कशी पोकळ निघालीत याची पोलखोल त्यांनी केली. मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचंही आश्वासन दिलं होतं. त्यासाठी मला 50 दिवस द्या असं ते म्हणाले होते.

कोरोना आला तेव्हा आम्ही 21 दिवसात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू असं ते म्हणाले होते. आमच्या भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही, असंही ते म्हणाले होते. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. भाजप सरकार प्रत्येक वेळी विकासाचा पाढा वाचत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून विकासाचा ढोल खोटा ढोल वाजवला जात असल्याची टीका होत असते.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #कर्जमाफी, #मोदीसरकारच्या #काळात #मोठ्या #उद्योगपतींचाच #विकास #तब्बल #23
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपुरात सुसज्ज क्रीडा संकुल होणार, भारतनानांच्या शब्दाची मुलाने घेतली दखल
Next Article सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही – शरद पवार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?