Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजस्थान : शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप अनावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

राजस्थान : शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप अनावर

admin
Last updated: 2025/07/26 at 5:34 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जयपूर, 26 जुलै – झालावाड जिल्ह्यातील पीपलोदी गावातील शासकीय शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेचे छत कोसळल्याने ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ३४ विद्यार्थी रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे.

Contents
शिक्षकांवर कारवाई, चौकशीचे आदेशप्रशासनाचा खुलासा : जोरदार पावसामुळे दुर्घटनादुर्घटनेपूर्वी विद्यार्थ्यांचा इशारा दुर्लक्षितसुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्हमुख्यमंत्र्यांकडून तातडीची पावले

दुर्घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली आणि रस्त्यावर टायर पेटवत आंदोलन छेडले. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

शिक्षकांवर कारवाई, चौकशीचे आदेश

या अपघातानंतर संबंधित शाळेतील ५ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, राज्याचे शिक्षणमंत्री यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गावकऱ्यांचा आरोप आहे की शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली होती, परंतु प्रशासनाने वेळेत कोणतीही कारवाई केली नाही.

प्रशासनाचा खुलासा : जोरदार पावसामुळे दुर्घटना

दुसरीकडे, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी ही दुर्घटना जोरदार पावसामुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे भिंती ओलसर होऊन छत कोसळल्याचे कारण सांगितले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, संबंधित वर्गात विद्यार्थ्यांना शिकवू नये असे आदेश आधीच प्राचार्याला देण्यात आले होते.

दुर्घटनेपूर्वी विद्यार्थ्यांचा इशारा दुर्लक्षित

मीडिया अहवालांनुसार, दुर्घटनेच्या काही वेळ आधीच काही विद्यार्थ्यांनी छताची अवस्था शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांना वर्गातच थांबवले गेले. अपघातातून बचावलेल्या एका विद्यार्थिनीने सांगितले की, “आम्ही दरवाज्याजवळ बसलो होतो. अचानक खडीचे कण पडायला लागले आणि काही क्षणांतच वर्गाचे छत कोसळले.”

सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह

गावचे सरपंच यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः जेसीबी मशीन घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि ढिगाऱ्याखालून १३ विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी प्रशासनावर आरोप केला की, वेळेत एम्ब्युलन्स न आल्याने जखमी विद्यार्थ्यांना दुचाकीवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली.

मुख्यमंत्र्यांकडून तातडीची पावले

राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त करत तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातील शासकीय शाळा, अंगणवाड्या, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक इमारतींची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

You Might Also Like

Стратегия торговли: Ретесты

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रातील सात आणि देशातील १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार
Next Article थायलंड-कंबोडिया सीमारेषेवर तिसऱ्या दिवशीही भीषण चकमक, ३० हून अधिक मृत्यू

Latest News

Стратегия торговли: Ретесты
Top News November 28, 2025
तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?