Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा ‘रामराम’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडराजकारण

रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा ‘रामराम’

Surajya Digital
Last updated: 2021/07/12 at 4:31 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा ‘रामराम’ केला आहे. त्यांनी रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. ‘भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही’, असं रजनीकांत यांनी स्पष्टपणे सांगितले. यापुढे ‘रजनी रसीगर नरपानी’ या संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. यामुळे रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशांच्या चर्चेवर आता पडदा पडला आहे.

https://twitter.com/ANI/status/1414464372638830598?s=19

दाक्षिणात्य तसेच बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर लगेचच कोरोना महामारी देशात थैमान घातलं. तसेच रजनीकांत यांची प्रकृतीही मध्यंतरी ठिक नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या सल्लागारांना एक पत्र लिहून कोरोना आणि त्यांच्या प्रकृतीमुळे ते राजकारणात प्रवेश करु इच्छित नसल्याचे सांगितलं होत.

यावरच आता सुपरस्टार रजनीकांत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राजकारणापासून कायमचा दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.  याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. त्याचबरोबर रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/ANI/status/1414471861803442181?s=19

सोबतच ‘भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही’, असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1414519269644148738?s=19

याविषयी माहिती देताना रजनीकांत म्हणाले की, ‘रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जिक करण्याचा मोठा निर्णय घेतला असून फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही. रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये रुपांतर करण्यात येईल.’ असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.

* रजनीकांतने घेतला यू टर्न

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रजनीकांतने सांगितलं होतं की, जानेवारी 2021 मध्ये नवीन पक्षाची स्थापना करणार आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी रजनीकांत पक्ष काढणार असल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रजनीकांतने यू टर्न घेतला आणि आपण राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं होतं.

https://twitter.com/rajinikanth/status/1414461069838323719?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1414461069838323719%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

त्यानंतर रजनीकांतच्या अनेक समर्थकांनी पुन्हा इतर पक्षांमध्ये प्रवेश केला होता. रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणापासून दुरावा पत्करला असला तरीही जनतेसाठी आपण कायमच काम करत राहणार असल्याचा विश्वासही दिला होता. त्यांच्या या घोषणेमुळं आता अनेकांनी निराशा झाली आहे.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष ; आजपासून शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश बंदी, मुख्यमंत्री तरी लोक भावना जाणून घेतील का ? https://t.co/47NIX7HJyl

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

TAGGED: #Rajinikanth's #goodbye #politics #forever, #रजनीकांत #राजकारणाला #कायमचा #रामराम #बरखास्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देशात मोठी जीवीतहानी; वीज पडून 68 जणांचा मृत्यू
Next Article सोलापुरातील 83 शाळांची घंटा वाजली, मात्र माळशिरस तालुक्यात घंटा नाही वाजली

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?