Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजू शेट्टी दूधदरवाढीवरुन बारामतीत झाले आक्रमक; सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

राजू शेट्टी दूधदरवाढीवरुन बारामतीत झाले आक्रमक; सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 10:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी त्यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना राज्य सरकारव टीकास्त्र सोडलं. “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

आज गुरुवारी दुपारी बारामतीत दाखल झाले. राजू शेट्टी बारामतीत दाखल होताच कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत त्यांचं स्वागत केलं. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आपल्यासोबत जनावरांनाही घेऊन आले होते. बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“आम्हाला जास्त जनावरं आणायची होती, पण पोलिसांनी अडवलं. आम्हाला अडवायचा पोलिसांना अधिकार आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करा. गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर, शेण विकलं जातं. पण आमच्या दुधाला किंमत नाही. गाढविनीच दूध 1 हजार रुपये लिटर किंमतीनं मिळतं. पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही?”, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

“दूध रस्त्यावर ओतलं म्हणून आमच्याकडे देशद्रोही म्हणून बघता. शेतकऱ्याने रागाच्या भरात दूध रस्त्यावर ओतलं तर तुम्हाला राग येतो. पण त्याची आणि पाण्याची किंमत काय? याचा विचार करा”, असं राजू शेट्टी म्हणाले. “तीन वर्षांच्या तुलनेत यंदा दूध उत्पादन कमी झालं. जनावरांच्या संख्येत फरक पडला. लॉकडाऊनमुळे दूध उत्पादनाला फटका बसला. लॉकडाऊन कुणी जाहीर केलं, त्यांनी विचार केला पाहिजे”, असं मत राजू शेट्टी यांनी मांडलं.

“उद्धव साहेब दूध उत्पादकांनी लोढणं का घेऊ नये? खाजगी दूध संघांना कुणी विचारत नाही. त्यांच्यावर नियंत्रण नाही. केंद्र सरकार दूध पावडरचा निर्णय घ्यायला तयार नाही. राज्य सरकारदेखील खमकी भूमिका घेत नाही. साखरच्या बाबतीत निर्यातीवर नियम मोडून निर्णय, मग दुधाबाबत का निर्णय होत नाही? “, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

“बाळासाहेब थोरातांच्या डेअरीत काय भाव आहे? याकडे बघा. उत्पादकाला 25 आणि वाहतुकीला 2 रुपये मिळत आहे. हे पैसे कुठे गेले? सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. सहा कोटी लिटर दुधाची खरेदी केली. त्यात दीडशे कोटी रुपये लुटले. मात्र भाववाढ झाली नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आधी सांगितलं मिळेल मात्र अजून मिळालेले नाही”, असं राजू शेट्टी म्हणाले.

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

TAGGED: #राजूशेट्टी #बारामती #आक्रमक #आंघोळ #दूधाने
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिराळा शहरात कृत्रिम गणेश विसर्जन स्थळांचा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी; नागरिकांचा चांगला प्रतिसाद
Next Article तुकाराम मुंढे यांनी केला गंभीर आरोप; हे सर्व भाजपचीच लोकं होती, दुसरे कोण करणार ?

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?