Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार

Surajya Digital
Last updated: 2021/09/04 at 7:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. राज्यपालांना दिलेल्या यादीत कोणताही बदल करण्यात आला नसून राजू शेट्टींचे नाव वगळण्यात आले नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. आम्ही आमचा दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळला आहे, असंही पवार म्हणाले.

राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केलेत यावर मी बोलणार नाही; असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वृत्त फेटाळून लावले आहे. पुण्यात शरद पवारांच्या हस्ते कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

राजू शेट्टी यांचं सहकार आणि कृषीक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊनच आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत दिले होते. पण पुढे काय झालं माहित नाही. राज्यपालांकडे तो विषय प्रलंबित आहे. आम्ही तरी त्यांचं नाव यादीतून वगळलेलं नाही; असं स्पष्ट खुलासा शरद पवार यांनी केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसेच दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. इतके दिवस दिल्लीत शेतकरी बसले आहेत, त्यांची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी होती. पण दुर्दैव आहे. अनेक राज्यात असं होत आहे पण अन्य राज्यात ही हा विषय आहे; अशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली.

मंदिर उघडण्याची भाजप मागणी करत आहे. पण विरोधकांनी याबाबत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे असा निर्देश आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ती काळजी घेत आहेत, अन्य घटक काही दुसरे मत असेल तर लोकशाही आहे. केंद्र सरकारच्या विचारांची लोक आहेत त्यांनी तारतम्य ठेवण्याची गरज आहे, असा टोलाही शरद पवारांनी विरोधकांना लगावला.

* करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा इशारा

केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचे हे राष्ट्रवादीने ठरवायचे, असे स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असे ते म्हणाले. दरम्यान, आता शरद पवार हे शेट्टींबाबत काय निर्णय घेतात, याची सर्वत्र चर्चा आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #RajuShetty #name #not #omitted #SharadPawar, #राजूशेट्टीं #नाव #वगळलं #शरदपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातून पोस्टाने पाठवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेणाच्या गोवऱ्या
Next Article विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ : 350 विद्यार्थ्यांच्या सृजनरंगांची बरसात; तयारी पूर्ण

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?