Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यपालांचा फोन, अर्णबला नातेवाईकांना भेटू द्या; गृहमंत्री देशमुख, शरद पवार काय म्हणाले ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज्यपालांचा फोन, अर्णबला नातेवाईकांना भेटू द्या; गृहमंत्री देशमुख, शरद पवार काय म्हणाले ?

Surajya Digital
Last updated: 2020/11/10 at 9:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटता येणार नाही. याबद्दल स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असे ते यावेळी म्हणाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून म्हटलं होतं की, अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटून द्यावं.

यावर स्पष्टीकरण देताना अनिल देशमुख म्हणाले की, कोरोना महामारीमुळे गेल्या ४ महिन्यांपासून कैदी आपल्या नातेवाईकांना भेटलेले नाहीत. राज्यपाल कोश्यारी यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले की, अर्णब यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू द्यावं, पण कोरोनाकाळात तुरुंगात कैद्यांना भेटण्यास बंदी आहे. पण अर्णब यांचे कुटुंबिय फोनवरून बोलणी करू शकतात. अर्णब यांची काळजी करण्याची गरज नाही ते सुरक्षित आणि सुस्थितीत आहेत असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकारण तापलेले आहे. भाजपच्या नेत्यांकडून सतत राज्य सरकारवर हल्ला चढवला जात आहे. त्यामुळे दिल्लीपर्यंत राजकारण तापलेले आहे. राज्य सरकार सुडाच राजकारण करत असल्याचे टीका केली जात आहे.

* शरद पवारांचा राज्यपालांना टोला

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #राज्यपालांचा #फोन #अर्णबलानातेवाईकांना #भेटूद्या #गृहमंत्रीदेशमुख #शरदपवारकायम्हणाले?
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेते शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा निवडून आलेल्या मतदारसंघात पुत्राचा पराभव
Next Article बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?