प्रयागराज , 22 मे (हिं.स.)।अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम ५ जूनपर्यंत पूर्ण होत असून, ३ जूनपासून सुरू होणाऱ्या सोहळ्यात राम दरबारची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, असे श्री राम जन्मभूमी निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले आहे.
मिश्रा यांनी सांगितले की, राम दरबारच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ५ जूनला होईल. अनुष्ठान ३ जून रोजी सुरू होईल. त्याबरोबरच परिसरात अन्य सात मंदिर उभारण्यात आले आहेत. त्या मंदिरांसाठीही धार्मिक अनुष्ठान त्याच दिवशी सुरू होईल. मंदिराचे निर्माणकार्य ५ जूनपर्यंत पूर्ण होईल. त्याचबरोबर भगवान श्रीराम यांची कथा दर्शवणारे भित्तिचित्रे मंदिराच्या खालच्या भागात लावली जाणार आहेत.
मंदिर ट्रस्ट याची अंतिम रूपरेषा तयार करीत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा नेहमीच भव्य होतो. परंतु यावेळी अतिथींची यादी वेगळी असू शकते.पूजा करणारे पुजारी वेगळे असू शकतात. अतिथींच्या यादीत राज्य किंवा केंद्रातील विशिष्ट लोक सहभागी नसतील, असेही ते म्हणाले. विविध धर्मांच्या आध्यात्मिक गुरूंना सोहळ्यासाठी बोलावण्याचा विचार सुरू आहे, असे मिश्रा यांनी सांगितले. मागील वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एका समारंभात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.