कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे त्याला आमचा पाठिंबाच आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाऐवजी स्वतंत्र आरक्षण द्यायला हवे. मात्र आरक्षणासाठी आर्थिक निकष लावणे चुकीचे आहे. देशातील जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे अत्यंत महत्त्वाचे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरक्षण हे आर्थिक निकषावर नको, जातीच्या आधारावरच हवे. जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी २०२१ ची जनगणना जातनिहाय व्हावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडे करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. तसेच नवीन कृषी कायदे रद्द होणार नाहीत मात्र त्यात काही बदल होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यासाठी तयारी आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करायला हवी आणि तसे झाले तरच यातून मार्ग निघणार आहे, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.