Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माळशिरस तालुक्यातील कटू राजकारणाला पूर्णविराम ? नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारणसोलापूर

माळशिरस तालुक्यातील कटू राजकारणाला पूर्णविराम ? नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 2:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अकलूज : राजकारणात कोण कोणाचे दुश्मन नसते आणि कोण कोणाचे मित्रही नसते असे म्हटले जाते. बदलत्या राजकीय प्रवाहात बदलता आले पाहिजे हा राजकारणाचा नवीन नियम लक्षात घेतला तर तो तंतोतंत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अंगीकारलेला दिसत आहे. त्यांनी नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात केली आहे.

नुकतीच त्यांनी एकेकाळी मोहिते पाटील कट्टर विरोधक असणाऱ्या संजीवनीताई पाटील यांची भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली. बदलत्या राजकारणाची सकारात्मकता त्यांच्यात यानिमित्ताने दिसून आली हे खरोखरच आदर्शवत असल्याची भावना सध्या तालुक्यातून व्यक्त होताना दिसत आहे.

माळशिरस तालुक्यातील मागील काही वर्षांचा राजकीय इतिहास तपासला असता मोहिते पाटील आणि संजीवनीताई पाटील हे राजकारणातील कधीही एक न होणारे दोन टोक समजले जात होते. पूर्वीपासून भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असणाऱ्या संजीवनीताईंनी नेहमीच पक्षनिष्ठा जपली. त्यांनी नेहमीच आपल्या पक्षाशी इमानेइतबारे कार्य केले. पण बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये मोहिते पाटील हे भाजपावाशी झाले. आणि मोहिते पाटील गटाचे नायक असणारे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व हे बदलत्या राजकीय घटनांचा वेध घेणारे नेतृत्व असल्याने जुन्या नव्यांचा ताळमेळ साधत तालुक्यातील भाजपाच्या एकीकरणासाठी प्रयत्नशील असताना दिसत आहेत.

यासाठी मध्यंतरी त्यांनी भाजपातील जुन्या जेष्ठ नेत्यांबरोबर ‘शिवरत्न’ बंगल्यावर बैठक घेत संवाद साधत विविध अडीअडचणी जाणून घेतल्या. पक्षामध्ये आपण नवीन आहोत पण जुन्या राजकारणासाठी वाद-विवाद नकोत, एकमेकांमध्ये गैरसमज नकोत, पक्ष पुढे न्यायचा असेल तर सर्वांची एकता हवी या व्यापक दृष्टिकोनातून आमदार रणजीतसिंह हे सध्या सक्रिय सहभाग घेऊन कार्य करताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा, माजी जि. प. सदस्या व माजी सरपंच संजीवनीताई पाटील यांची त्यांच्या ‘सत्यम’ या निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीमध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली व भाजपाच्या ध्येय धोरणासह अनेक विषयावर चर्चा केली. जुन्या जळमटांना तिलांजली देत व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी निसंकोचपणे संवाद साधला. खरोखरच या भेटीने माळशिरस तालुक्यात एका नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात झाली असून कटू राजकारणाला पूर्णविराम मिळालेला आहे. भाजपाचे बाळासाहेब सरगर ,बाळासाहेब वावरे यांच्या निवासस्थानी जाऊनही त्यांनी जुन्या जाणत्यांना विश्वास दिला आहे.

नव्या राजकारणाची नांदी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सर्वांना बरोबर घेऊन केली असल्याचे यानिमित्ताने बोलले जात असून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय प्रगल्भता यानिमित्ताने स्पष्टपणे जाणवू लागली आहे. त्यामुळेच माळशिरस तालुक्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे…!

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

भाजपने राऊत यांच्यावर केली तीव्र टीका; सैन्याच्या अपमानासाठी माफी मागण्याची मागणी

TAGGED: #अकलूज #नवाअध्याय #मोहितेपाटील #शिवरत्न #सत्यम #संजीवनीताईपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे निधन; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात राजकीय दुखवटा
Next Article झोपलेले म्हणायचे का झोपलेले सोंग घेतलेले; सोलापूरकरांनो तुम्ही थंडच रहा, तुम्हाला पुसतो कोण ?

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?