नवी दिल्ली : दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला तर तुमच्यावर एफआयआर दाखल होऊ शकतो. जर एफआयआरनंतर पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही तर हे प्रकरण कोर्टाही जाऊ शकते. त्यामुळे आता रावणाचा पुतळा जाळणे महागात पडणार आहे. वाचा सविस्तर कशामुळे आता महागात पडणार आहे.
वकील ओमवीर सारस्वत यांचे म्हणणं आहे की रावण महाराज यांचा पुतळा जाळल्यामुळे आमची आस्था दुखावली जाते. आम्ही रावणाची पूजा करतो. त्यांच्या या घोषणेमुळे पोलीस अॅक्शनमध्ये आलं होतं. बातचीतनंतर ओमवीर एफआयआर दाखल करण्याबाबत मानले, मात्र रावण जाळण्याचा विरोध जारी राहणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मथुरामध्ये राहणारे वकील ओमवीर सारस्वत म्हणाले की, आम्ही रावण महाराजांच्या गोत्रातून आहोत. या आस्थेमुळे आम्ही त्यांची पूजा करतो. ते एक महान ज्ञानी आणि तपस्वी होते. मात्र काही लोक कुप्रथेमुळे प्रत्येक वर्षी रावण महाराजांचा पुतळा दहन करतात. मात्र पुतळा दहन केल्यामुळे काय होतं? आणि यामागे काय कारण आहे? लोकांना असं काही विचारल्यास त्यांच्याकडे काही उत्तर नसतं. यासाठी आम्ही एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओमवीर सारस्वत यांनी सांगितले की, आम्ही लवकरच यमुना किनाऱ्यावर रावण महाराजांच्या मंदिराची स्थापना करणार आहोत. हे मंदिर लहानशा जागेत असेल. मात्र येथे दररोज रावण महाराजांची पूजा होईल आणि ही एक सुरुवात आहे. यासाठी जनसंपर्क केला जाईल. ओमवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार रावण महाराजांना मानणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे.