Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन’

Surajya Digital
Last updated: 2022/04/03 at 9:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, असे ठाकरे सरकारचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही, असे ठाकरे म्हणाले होते.

काल राज ठाकरेंनी मदरशात एक धाड टाका असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज ठाकरेंकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज ठाकरे यांनी आग लावण्याचं काम करु नये, त्यांचा उद्देश स्पष्ट दिसतोय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. कालपर्यंत महाराष्ट्राचा विकासाची, रोजगाराची भाषा करणारे राज ठाकरे यांनी कालपासून तरूणांना रोजगार देण्याचे काम सुरू केले आहे. तरूणांनी मशिदी समोर जायचे. यामुळे दोन्हीकडून आग लागेल. राज ठाकरे राजतीर्थावर घरी निवांत बसून मजा बघतील. आंदोलन करणारे तुरुंगात जातील, सोडायला कोणीही येत नाही. मग आई वडिलांना धावपळ करावी लागते. हे काय नवीन नाही जुनेच गणित आहे.

‘If I find a razor in a madrassa, I will leave politics’

कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात 67% हिंदू आहेत आणि 33% मुसलमान त्यात मी 75000 मतांनी विजयी झालो कळव्यातून 30000 ची आघाडी आणि मुंब्र्यातून 45000 मतांची आघाडी लोक कामावर मत देतात जाती पाती वर नाही ….18 तास राबावे लागते.शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

काल त्यांना अचानक बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा पुळका आला. कधी आयुष्यात जय भीम म्हणाले आहेत का? कधी घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर गेलेत का? असा सवाल देखील आव्हाडांनी या वेळी उपस्थित केला. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. कारण नसताना मुंब्राबद्दल राज ठाकरेंनी जातीयवादी विधान केले आहे. राज ठाकरेंनी माझ्यासोबत कोणत्याही मदरशात यावे त्यांना दाढीचा वस्तरा जरी सापडला तर राजकारण सोडेन असे थेट आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात 67% हिंदू आहेत आणि 33% मुसलमान त्यात मी 75000 मतांनी विजयी झालो कळव्यातून 30000 ची आघाडी आणि मुंब्र्यातून 45000 मतांची आघाडी लोक कामावर मत देतात जाती पाती वर नाही ..18 तास राबावे लागते.शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते असा टोलाच राज ठाकरेंना आव्हाड यांनी लगवाल आहे.

प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच . हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा प्रवास असल्याची खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #find #razor #madrassa #leave #politics #jitindraawad, #मदरशा #वस्तरा #सापडला #राजकारण #राजठाकरे #जितेंद्रआव्हाड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये संदीप पाठक ठरला पुरस्काराचा मानकरी
Next Article अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?