Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय टीम बनली नंबर वन; रोहित भारताचा यशस्वी कर्णधार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

भारतीय टीम बनली नंबर वन; रोहित भारताचा यशस्वी कर्णधार

Surajya Digital
Last updated: 2022/02/22 at 8:39 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजला वनडे आणि टी-२० मालिकेत धूळ चारली. यासह भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी- २० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. तसेच घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी- २० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. शिवाय भारताने टी-२० क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला.

भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी – २०तही पाहुण्या वेस्ट इंडिजला ३-० ने क्लीन स्वीप दिला. या मालिका विजयासोबतच भारताने टी-२० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर मजल मारली आहे. जवळपास सहा वर्षांनंतर हे घडले आहे, जेव्हा टीम इंडियाला टी-२० मध्ये नंबर वन स्थान मिळाले आहे.

यापूर्वी, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २०१६ मध्ये शेवटच्या वेळी हे स्थान मिळवता आले होते. याआधी भारतीय संघ १२ फेब्रुवारी २०१६ ते ३ मे २०१६ या कालावधीत टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता, त्यानंतर कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात आले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दीर्घकाळ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला, मात्र टी-२० मध्ये त्याने हा मुकुट मिळाला नाही. The Indian team became number one; Rohit is a successful captain of India

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

भारताच्या खात्यात २६९ रेटिंग गुण झाले आहेत. तर इंग्लंडचेही २६९ रेटिंग गुण आहेत. मात्र त्यांचे एकूण गुण हे १०,४८४ तर इंग्लंडचे एकूण गुण १०,४७४ असल्याने त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
त्यांच्यापाठोपाठ पाकिस्तान (२६६) तिसऱ्या, न्यूझीलंड(२५५) चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका (२५३) पाचव्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाने नुकतीच श्रीलंकेविरुद्धची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकल्याने ते २४९ रेटिंग गुणासह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अनुक्रमे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचा नंबर लागतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, ज्यामध्ये भारताने ३-० असा विजय मिळवला. आता वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिकाही भारताने ३-० अशी जिंकली आहे. रोहित शर्मा टी-20 इतिहासातील भारताचा तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.

टी-२० फॉर्मेटमध्‍ये टीम इंडियाने सलग ९ सामने जिंकले आहेत. आता भारतासमोर श्रीलंकेचे आव्‍हान असेल. भारतीय संघ श्रीलंकेविरोधात टी-२० मालिकेत तीन सामने खेळणार आहे. पहिला सामना २४ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे होणार असून, २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुसरा व तिसरा सामना होणार आहे.

 

You Might Also Like

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रमी १५० वा वनडे सामना

जागतिक कुस्ती स्पर्धा : कुस्तीपटू अमन सेहरावत वजनामुळे अपात्र

इंग्लंड टी-२० क्रिकेटमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला संघ

बीसीसीआय उपाध्यक्ष शुक्लांनी रोहित-कोहलीच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळल्या

TAGGED: #Indian #team #numberone #Rohitsharma #successful #captain #t20, #भारतीय #टीम #नंबरवन #रोहितशर्मा #यशस्वी #कर्णधार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उठसुठ विठ्ठल कारखानाच दिसतो का…? जयंत पाटलांनी घेतली हजेरी
Next Article हिजाबचा वाद शांत होत असताना बजरंग दलाच्या हर्षाची हत्या

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?