Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘महावितरण’चा शेतकऱ्यांना ‘झटका’; थकबाकीसाठी पूर्वसूचना न देताच रोहित्र बंद; बळिराजा संतप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

‘महावितरण’चा शेतकऱ्यांना ‘झटका’; थकबाकीसाठी पूर्वसूचना न देताच रोहित्र बंद; बळिराजा संतप्त

Surajya Digital
Last updated: 2023/02/13 at 9:50 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● वीज वापराच्या दुप्पट अनुदान

सोलापूर : सोलापूर – जिल्ह्यात असणाऱ्या तीन लाख ६८ हजार शेतीपंप ग्राहकांच्या कृषिपंपांची पाच हजार ३३० कोटी रूपयाची थकबाकीच्या कारणामुळे वसुलीसाठी ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीस थेट रोहित्रांचाच वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र विद्युत वितरण कंपनीने सुरू केलंय. यामुळे आता नावापुरताच राहिलेला बळीराजा संतप्त झाला आहे.  ‘Mahavitaran’ ‘shock’ to farmers; Rohitra closed without prior notice for arrears

 

गेल्या पाच दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीने रोहित्रांचाच वीज पुरवठा खंडित करण्याचं काम जिल्ह्यात सुरू केले आहे. त्यामुळे अडचणीत असणाऱ्या बळीराजाला ४४० चा झटका बसला आहे. यामुळे ऊस तोडणीचा हंगाम वेग घेत असताना आणि रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची गरज असताना महावितरणच्या या कारवाईमुळे शेतकरी संतापले आहे.

 

राज्यात कृषीपंपासाठी सगळ्यात जास्त वीजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात होतो. महागडी चारचाकी वाहन वापरणारे, बंगल्यात राहणारे व नियमित आयकर भरणारे शेतकरी याच जिल्ह्यांमध्ये असूनही वीजबिल मात्र भरत नाहीत. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणारे श्रीमंत शेतकरी या भागात आहेत. पाचही जिल्ह्यात कृषीपंपासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून ऊस, फळबागा, भाजीपाला व फुलशेती, यासाठी वीजेचा वापर करणाऱ्या सधन शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, असे निरीक्षण ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

त्यामुळे आता वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. काही शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तर काही शेतकऱ्यांनी सवलत मागूनही कनेक्शन तोडले जात आहे. साखर कारखान्याला ऊस गेला, शेतीमाल बाजारात विकला, तरीपण शेतकऱ्यांनी विजबिल भरले नाही म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारकडून कोणताही लेखी आदेश नसताना केवळ वरिष्ठांच्या तोंडी सांगण्यावरून शेतकऱ्यांची उभी पिके जाळण्याचे काम महावितरणकडून केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे तात्काळ वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्याची मागणी होत आहे.

 

वीजबिलाच्या थकबाकीत ‘सवलत शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने नवीन कृषिपंप धोरण-२०२० तयार केले. त्याअंतर्गत ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरल्यावर एकूण थकबाकीत ३० टक्के सूट दिली जात आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ केले जात आहे. या धोरणाची अंमलबजावणी जानेवारी २०२१ पासून केली जात आहे. जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सूट देण्यात आली होती. पण, आता एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ३० टक्केच सूट मिळणार आहे.

 

● वीज वापराच्या दुप्पट अनुदान

 

सरकार शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वीज बिल धरत नाही. हे सरकारला माहिती आहे, म्हणून तर विज कायदा २००३ च्या कलम ६५ प्रमाणे कृषीपंप धारकांना अनुदान देत आहे. हे अनुदान विज वापराच्या दुप्पट दिले जाते हे माहिती अधिकारात सिध्द झाले आहे. तसेच जनहित याचिका ५४६/२०१० व ८६५१/२०२० मध्ये निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत.

शेतकऱ्यांना विज कायदा २००३ च्या कलम ५६(१) ची नोटिस द्या असे आदेश झाले आहेत. तसेच जनहित याचिका ४४/२०१२ मध्ये ७ फेब्रुवारी २०१३ च्या प्रतिज्ञापत्रात वाणिज्य विभाग प्रमुख मु. स. केळे यांनी विजपुरवठा खंडित करणार नाही असे सांगितले आहे. तसेच अन्न आयोगानेही विज पुरवठा खंडित करू नका. असे असताना शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित होत असेल तर सरकार कायदेशीर चालत नाही हे सिध्द होते व सत्ताधारी कायदा पायदळी तुडवत आहेत.

 

मग आता शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आता कायदा हातात घ्या. आता कोणताही राजकीय पक्ष आपल्या बाजूने राहिला नाही. आता आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केले.

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #Mahavitaran #shock #farmers #Rohitra #closed #without #priornotice #arrears #angry #Solapur #, #महावितरण #शेतकरी #झटका #थकबाकी #पूर्वसूचना #रोहित्र #बंद #बळीराजा #संतप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सीआयडी मालिकेमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचे हरवलेले दागिने बारा तासात रिकव्हर
Next Article रिकव्हरी अन्‌ काटामारीत सोलापूर अव्वल; सोलापूरच्या साखर कारखानदारांवर सदाभाऊंचा गंभीर आरोप!

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?