Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: साई सुदर्शन ठरला एकाच मैदानात सलग पाच अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

साई सुदर्शन ठरला एकाच मैदानात सलग पाच अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज

admin
Last updated: 2025/04/10 at 2:41 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहमदाबाद, 10 एप्रिल (हिं.स.)।गुजरात टायटन्स संघाने आपल्या घरच्या मैदानावर राजस्थानचा ५८ धावांनी पराभव करत दमदार विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, ज्यामध्ये साई सुदर्शनच्या खेळीचं मोठं योगदान आहे. दरम्यान त्याने या सामन्यात साई सुदर्शनने इतिहास रचला आहे. साई सुदर्शनने एकाच आयपीएल मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करत पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर, साई सुदर्शनने २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त धावांचे सलग दोन डाव खेळले. त्यानंतर, या वर्षीही त्याने याच मैदानावर सलग तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावांचा डाव खेळला आहे. त्यामुळे एकाच आयपीएल मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा साई सुदर्शन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजांनी अशी कामगिरी केली नाही, ते आता साई सुदर्शनने करून दाखवलं आहे. २०१८ ते २०१९ दरम्यान आरसीबीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्सनेही असाच पराक्रम केला होता.

साई सुदर्शनने यावर्षी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ७४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर, त्याने याच मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध ६३ धावांची शानदार खेळी केली होती. तो आरसीबीविरुद्ध ४९ धावांवर बाद झाला होता, पण हा सामना बंगळुरूमध्ये खेळवण्यात आला. यानंतर, हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो फक्त ५ धावा करू शकला. पण तो पुन्हा अहमदाबादला परतताच त्याने शानदार खेळी केली होती.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘आपले सरकार पोर्टल’ आजपासून १४ एप्रिल पर्यंत बंद
Next Article जेजुरीच्या खंडोबा मंदिर आणि गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?