Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, पक्ष गेला खड्यात, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, पक्ष गेला खड्यात, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार

Surajya Digital
Last updated: 2020/10/09 at 8:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

उस्मानाबाद : आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल, त्यावेळी तलवारी  काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या मोर्चात खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले आहे. यावेळी संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याशिवाय, आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असेही संभाजीराजे यांनी यावेळी म्हटले आहे.

* अशोक चव्हाणांच्या घरासमोर आंदोलन

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, असे संभाजीराजे म्हणाले. तसेच, येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

* ८० टक्के मराठा समाज गरीब

१९०२ मध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. ८० टक्के मराठा समाज गरीब आहे. मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

आ. छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटी ची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद

आठ लाख शेतकर्‍यांना सौर ऊर्जा पंप – उपमुख्यमंत्री पवार

उत्तराखंडमध्ये ‘हेलिकॉप्टर-क्रॅश’

ओबीसींना जातनिहाय आरक्षण हवे : आ.भुजबळ

महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग संघाची खेलो इंडिया युथ गेम्समध्ये झळाळती कामगिरी

TAGGED: #संभाजीराजे #उस्मानाबाद #मराठाआरक्षण #पर्व #तलवारीकाढू #पक्ष #खड्यात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विद्यापीठ आवारात अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवा; उदय सामंतांकडे शिवसेनेची मागणी
Next Article तलवार कोणा विरोधात उपसणार? काँग्रेस नेत्याचा सवाल

Latest News

रामराजेंच्या घरी अचानक धडकला पोलिसांचा फौजफाटा उडाली खळबळ, पुढे काय झाले?
सोलापूर May 17, 2025
आ. छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटी ची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद
महाराष्ट्र May 17, 2025
सरकारने शाळांवर उगारली कारवाईची छडी, पण कारण तरी काय?
सोलापूर May 17, 2025
आठ लाख शेतकर्‍यांना सौर ऊर्जा पंप – उपमुख्यमंत्री पवार
महाराष्ट्र May 17, 2025
सोलापुरातील साठ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
सोलापूर May 17, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ६२,६०० बेघर कुटुंबांनी नोंदविली नावे
सोलापूर May 17, 2025
जागतिक व्यासपीठावर देशाची बाजू मांडणार
देश - विदेश May 17, 2025
उत्तराखंडमध्ये ‘हेलिकॉप्टर-क्रॅश’
महाराष्ट्र May 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?