Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रशिवार

खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 9:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : खानापूर तालुक्यात गेली दोन – तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.‌ यातच चिंचणी ( ता.कडेगाव ) येथील तलावातील पाणी सोनहिरा ओढ्यात सोडले आहे.‌ परिणामी, येरळानदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.‌

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रामापूर – कमळापूर या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. शेतीच्या कामासाठी ये – जा करणे बंद झाले आहे. मध्यंतरी रामापूर – कमळापूर पुलाची उंची वाढवावी , यासाठी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात लाख रूपये खर्चून डागडुजी केली होती. परंतु पूलाची उंची वाढविण्याचा प्रश्न रखडलेला आहे.

येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिमेंट बंधारे, ओढे, नाले पाण्याने भरले आहेत. घाटमाथ्यावरील अग्रणीनदीला पाणी आले आहे. लोकसहभागातून बांधलेले बंधारे पाण्याने भरले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकावलेल्या पिकांना उपलब्ध पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #सांगली #बलवडीबंधारा #खानापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तहसीलदाराच्या घरावर टाकली रेड; रक्कम पाहून एसीबी अधिकारीसुद्धा झाले चकीत
Next Article सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविकांना 50 लाखाचे विमा कवच

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?