Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीतील ‘तो’ वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय; पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी निर्णयाबद्दल व्यक्त केले समाधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगलीतील ‘तो’ वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय; पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी निर्णयाबद्दल व्यक्त केले समाधान

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 6:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्षाचा वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी वटवृक्ष वाचविण्याबाबतचे पत्र सर्व संबंधितांस दिले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वटवृक्ष विचाविण्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. तसेच याबाबत मंत्री ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक लोकांनी वटवृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन केले होते. या सर्वांची दखल घेत आता वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय झाला आहे.

या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत यापुढील काळातही राज्यातील कोणतीही विकासकामे ही पर्यावरणाचे संवर्धन करुनच केली जातील, याबाबत आपण स्वत: बारकाईने लक्ष ठेवून कार्यवाही करु, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. याबरोबरच या निर्णयाबद्दल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे तसेच सांगली जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम आणि उपविभागीय अधिकारी यांचे आभार मानले आहेत.

हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे. नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचणार होती. वटवृक्ष तोडावा लागणार होता. वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाचा विचार करता संबंधित जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती.

* सुमारे ४०० वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष

रत्नागिरी – कोल्हापूर – मिरज – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे काम सध्या सुरु आहे. मिरज ते पंढरपूर शहरांच्या दरम्यान महामार्ग मोजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) गावातून जातो. या गावातील गट क्रमांक ४३६ येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे ४०० चौ.मी. व्यापक आहे.

“राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधीत वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे. विकास कामे करताना राज्याचा वारसा आणि पर्यावरण जपणे गरजेचे आहे. कोणतीही विकासकामे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे”

आदित्य ठाकरे – पर्यावरण मंञी

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #सांगली #वटवृक्ष #वारसा #पर्यावरण #गडकरी #४००वर्षापूर्वीचे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कायमस्वरुपी जागा दिल्याशिवाय पालखी मार्गावरील घरे काढण्यास विरोध; आंदोलन छेडण्याचा इशारा
Next Article सोलापूरचा मृत्यू दर घटला; 10 टक्‍क्‍यांवरून आता 5.7 टक्क्यांवर

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?