Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संजय राऊत राहुल गांधींचे पगारी नोकर बनले – नवनाथ बन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

संजय राऊत राहुल गांधींचे पगारी नोकर बनले – नवनाथ बन

admin
Last updated: 2025/08/18 at 4:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, १८ ऑगस्ट – शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि त्यांचा गट काँग्रेसचे बटीक झाले असून, राऊत हे राहुल गांधींचे पगारी नोकर बनले आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बन म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मात्र, काँग्रेसच्या प्रवक्त्यांऐवजी संजय राऊत राहुल गांधींची बाजू मांडतात हे हास्यास्पद आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला जागा वाढल्या असताना कुणी आक्षेप घेतला नाही. पण विधानसभेला भाजपाला बहुमत मिळताच निवडणूक आयोग व ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. “माझी शिवसेना जर काँग्रेससारखी झाली तर दुकान बंद करेन,” हा बाळासाहेबांचा ठाम विचार होता. पण आता राऊत काँग्रेसची वकीली करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तपासले पाहिजे की राऊत हे आपल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत की काँग्रेसचे, असे त्यांनी खोचकपणे म्हटले.

सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेवरही त्यांनी राऊत यांना धारेवर धरले. “सामना काँग्रेसचे मुखपत्र आहे का?” असा थेट सवाल बन यांनी केला.

यावेळी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा झाल्यानंतर उबाठा गटाने अभिनंदन न करता काँग्रेसची भूमिका स्वीकारली, यावरही तीव्र टीका केली.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या लंडन दौर्‍यावर राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन म्हणाले की, आशीष शेलार हे रघुजीराजे भोसले यांची तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी गेले होते. मराठ्यांच्या इतिहासाचे प्रतीक असलेली तलवार राज्यात आली तर तिचे स्वागत व्हायला हवे. “तुमच्याकडे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा स्वाभिमान शिल्लक असेल तर तलवारीचे दर्शन घ्या,” असा इशारा त्यांनी राऊत व आदित्य ठाकरे यांना दिला.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुनीरच्या वक्तव्याला पाकिस्तानी गृहमंत्र्यांची दुजोरी
Next Article अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?