Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संजय राऊत राहुल गांधींचे पगारी नोकर बनले – नवनाथ बन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

संजय राऊत राहुल गांधींचे पगारी नोकर बनले – नवनाथ बन

admin
Last updated: 2025/08/18 at 4:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, १८ ऑगस्ट – शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि त्यांचा गट काँग्रेसचे बटीक झाले असून, राऊत हे राहुल गांधींचे पगारी नोकर बनले आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बन म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मात्र, काँग्रेसच्या प्रवक्त्यांऐवजी संजय राऊत राहुल गांधींची बाजू मांडतात हे हास्यास्पद आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला जागा वाढल्या असताना कुणी आक्षेप घेतला नाही. पण विधानसभेला भाजपाला बहुमत मिळताच निवडणूक आयोग व ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. “माझी शिवसेना जर काँग्रेससारखी झाली तर दुकान बंद करेन,” हा बाळासाहेबांचा ठाम विचार होता. पण आता राऊत काँग्रेसची वकीली करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तपासले पाहिजे की राऊत हे आपल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत की काँग्रेसचे, असे त्यांनी खोचकपणे म्हटले.

सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेवरही त्यांनी राऊत यांना धारेवर धरले. “सामना काँग्रेसचे मुखपत्र आहे का?” असा थेट सवाल बन यांनी केला.

यावेळी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा झाल्यानंतर उबाठा गटाने अभिनंदन न करता काँग्रेसची भूमिका स्वीकारली, यावरही तीव्र टीका केली.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या लंडन दौर्‍यावर राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन म्हणाले की, आशीष शेलार हे रघुजीराजे भोसले यांची तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी गेले होते. मराठ्यांच्या इतिहासाचे प्रतीक असलेली तलवार राज्यात आली तर तिचे स्वागत व्हायला हवे. “तुमच्याकडे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा स्वाभिमान शिल्लक असेल तर तलवारीचे दर्शन घ्या,” असा इशारा त्यांनी राऊत व आदित्य ठाकरे यांना दिला.

You Might Also Like

नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

मतदार यादीवर आक्षेप नोंदवा, अन्यथा निवडणुकीनंतर दोष देऊ नका – बावनकुळे

इंडी आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना शेवटच्या रांगेत आसन; शिंदे गटाचे प्रतिकात्मक आंदोलन

रावसाहेब दानवे यांची कन्नडच्या भाजप पदाधिकाऱ्यांशी भेट

मतदार यादीबाबतच्या आरोपांवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून राहुल गांधींना शपथपत्र मागणी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुनीरच्या वक्तव्याला पाकिस्तानी गृहमंत्र्यांची दुजोरी
Next Article अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?