Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाझीपूर बॉर्डरवर घेतली शेतकऱ्यांची भेट, कोण काय म्हटले ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाझीपूर बॉर्डरवर घेतली शेतकऱ्यांची भेट, कोण काय म्हटले ?

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 5:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी विषयक बिलाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली वेशीवर देशभरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन गेल्या ७९ दिवसांपासून सुरूच आहे. त्यात प्रजासत्ताक दिनी घडलेल्या घटनेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते.

आज शिवसेना खासदार संजय राऊत गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं राऊत यांनी सकाळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं होतं.
खासदार संजय राऊत यांच्यासोबत अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव ,कृपाल तुमाणे हे नेतेही गाझीपूरला पोहोचले आहेत. यादरम्यान खासदार संजय राऊत यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘विरोधक आम्हाला पाठिंबा देण्यास येत असल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण त्याचं राजकारण होऊ नये,’ असं टिकैत म्हणाले. ‘राजकीय नेते आमच्या भेटीसाठी येत असल्यास त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. या भागातील वाहतुकीची समस्या पोलिसांनी केलेल्या बॅराकेडिंगमुळे निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी वाहतूक रोखून धरलेली नाही,’ असं टिकैत यांनी म्हटलं.

संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारनं त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतंही राजकारण येऊ देऊ नये,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

शेतकरी आंदोलकांच्या केंद्र सरकारसोबत ११ वेळा चर्चा झाल्या. मात्र, तरीही यावर अद्याप तोडगा निघू शकला नाही. हे कृषी बील रद्द व्हावे, या मागणीवर शेतकरी आडून बसले आहेत. या शेतकऱ्यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

TAGGED: #शिवसेनानेते #संजयराऊत #गाझीपूर #बॉर्डरवर #घेतलीशेतकऱ्यांचीभेट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? जानकरांची भाजपावरील नाराजी सोलापुरात उघड
Next Article विठुमाऊलीचे दर्शन लांबले, माघी वारी रद्द, दशमी – एकादशीला दर्शन बंद

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?