Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले

admin
Last updated: 2025/06/16 at 4:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 16 जून (हिं.स.) : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही भटक्या विमुक्त समाजातील नागरिक सरकारी योजनांपासून कोसो दूर आहेत. पाठीवर बिऱ्हाड आणि हातावरच पोट असलेल्या या नागरिकांना त्यांचाच ठाव ठिकाणा माहिती नसतो. त्यामुळे सरकारी कागदपत्रांच्या जाचक नियमापासून ते दूरच असतात. म्हणूनच त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषद आणि भारतीय सिकलीकर संघटना प्रयत्नशिल आहेत. नुकतेच त्यांनी तब्बल ५५० सिकलीकर वैदू आणि मांगगारुडी समाजातील नागरिकांना जातीच्या दाखल्याचे वाटप केले आहे. राजे उमाजी नाईक महाराज स्वाभिमान योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

या वेळी हडपसरचे मंडलाधिकारी शेखर शिंदे, परिषदेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य शुभांगी तांबट, परिषदेचे हितरक्षा प्रमुख डॉ. जितेंद्र ठाकूर, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते अभिजीत बोराटे, सिकलीकर संघटनेचे अध्यक्ष चांदसिंग कल्याणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी भारतमाता, महाराजा रणजीतसिंग, राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रामुख्याने भटके विमुक्त समाजातील सिकलीकर वैदू व मांगगारुडी समाजातील ५५० नागरिकांना जातीचे दाखले मंडल अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.

समाजातील होतकरू आणि दुर्लक्षित घटकाला जातीचे दाखले उपलब्ध केल्याबद्दल चांदसिंग कल्याणी यांनी प्रशासनाचे आभार मानले. तसेच संघटनेचे शक्तिसिंग कल्याणी यांनी येणाऱ्या काळामध्ये जातीच्या दाखलांचा फायदा कसा होईल, याची माहिती दिली शुभांगी तांबट यांनी परिषदेचे काम कसे चालते याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला नगरसेवक मारुती तुपे, गुरूद्वारा गुरुनानक दरबार साहिबचे प्रधान चरंजीतसिंग सहानी, डॉ. जितेंद्र ठाकुर, पालावरची शाळांच्या शिक्षिका आदि उपस्थित होते. भगतसिंग कल्याणी यांनी आभार मानले. —————

You Might Also Like

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर

शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Next Article शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
महाराष्ट्र June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?