Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाळा 15 अॉक्टोबरपासून होणार सुरु; शाळेत पूर्णवेळ मास्क अनिवार्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

शाळा 15 अॉक्टोबरपासून होणार सुरु; शाळेत पूर्णवेळ मास्क अनिवार्य

Surajya Digital
Last updated: 2020/10/06 at 7:41 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या देशभरातील शाळा 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यासंबंधीचे निर्देश यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिले आहेत.

सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा तसेच भौतिक दुरत्वाच्या मानकांचे पालन करीत शालेय शिक्षणासाठी स्वत:ची मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही दिले आहेत.

राज्य सरकारांनी राज्यातील स्थिती लक्षात घेत पालकांसोबत चर्चा करून शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता योग्य नियमावली (एसओपी) तयार करण्याचे महत्त्वाची जबाबदारी आता केंद्राकडून राज्यांच्या शिक्षण विभागावर सोपवण्यात आली आहे.
शाळेत विद्यार्थ्यांदरम्यान सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल. वर्गखोली, मैदान, प्रयोगशाळेत पूर्णवेळ मास्क घालावा लागेल. हात स्वच्छ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. शाळेत प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती संबंधित नियमांमध्ये लवचिकता आणावी लागेल.

कोरोना संसर्गाचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशभरातील शाळा, महाविद्यालये गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. 1 ऑक्टोबरला देशात ‘अनलॉक-5’ घोषित करण्यात आला. या अनलॉकमध्ये 15 ऑक्टोबरपासून नियंत्रण क्षेत्र वगळता इतर भागातील शाळांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली सरकारने यापूर्वीच 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात कोरोना स्थिती लक्षात घेता आणखी काही राज्य सरकारांकडून अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You Might Also Like

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त

सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

TAGGED: #शाळा #15अॉक्टोबर #केंद्रसरकार #मास्क #अनिवार्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोठ्या भावाने रागावून मारहाण केल्याच्या रागातून भावानेच केला भावाचा खून
Next Article होय…! नोटांमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका – आरबीआय

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?