नवी दिल्ली : कोरोना लॉकडाउनमुळे देशातील शाळाही बंद होत्या. अनलॉकच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये शाळांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र आता केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये शाळा उघडता येणार नाहीत.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच शाळा उघडता येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीतसुद्धा याबाबत सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये शाळा उघडता येणार नाहीत. कंटेंनमेंट झोनच्या बाहेरच शाळा उघडता येतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शाळा सुरु केल्या तरी प्रार्थना, खेळ आणि इतर कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी नाही. कारण यावेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम महत्वाचा असून याबाबत सक्तीने सूचना केल्या आहेत.
तसंच सरकारने असंही म्हटलं आहे की, डिस्टन्स लर्निंग सुरुच ठेवलं जाईल आणि त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. याशिवाय शाळांमध्ये सॅनिटायझेशनबाबतही काही सूचना सरकारने केल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षकांकडून माहिती मिळाल्यानंतर शाळेला जाता येईल. मात्र यातही कंटेनमेंट झोनमध्ये असेलल्या विद्यार्थ्यांना शाळेला जाता येणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेतसुद्धा पालक आणि शिक्षकांच्या लेखी परवानगीनंतरच जाता येईल.
* यांना शाळेत ‘नो एंट्री’
क्वारंटाइन झोनमधील विद्यार्थी, शिक्षक वा कर्मचारी – विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना कोणताही आजार असल्यास यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय शाळेत अशाच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रवेश द्यावा ज्यांना कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. एखाद्या वेळी कोणत्याही शाळेत कोरोनासदृश्य लक्षणं आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करून घ्यावी, असंही नियमावलीत सांगण्यात आलं आहे.