Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत

Surajya Digital
Last updated: 2023/01/25 at 6:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील■ संशोधनाची किमयास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग

□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील

सोलापूर – सोलापुरी चादरी आणि कडक भाकरीसाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते.  Scientist who lost loved ones to cancer discovers organic fertilizer Malshiras Research Alchemy पण, सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात मोठया प्रमाणावर करतील, असं तुम्हाला सांगितलं तर… तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील दसूर येथील शेतकरी सुभाष कागदे यांच्या शेतात याबाबतचा प्रयोग देखील सुरू आहे.गुजरातमधल्या सुरतचे डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनातून ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीचा पर्याय अवलंबला तर येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देखील आपल्या गव्हाची निर्यात देशभर करू शकतात. गव्हाच्या निर्यातीमध्ये उत्तर भारतामधील राज्यांची मक्तेदारी आहे. बाहेरच्या देशामध्येही याला मोठी मागणी आहे. उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये हे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून जमीनीचा कस आणि आरोग्यास धोका निर्माण झाले आहेत.

■ संशोधनाची किमया

 

माळशिरस तालुक्यातील दसूर या गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी या सेंद्रिय खताची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या शेतात दोन भाग केले. त्यापैकी एक एकरमध्ये त्यांनी रासायनिक खत टाकून गहू लावला. त्याला अद्याप लोंब्या आल्या नाही आणि वाढही झाली नाही तर चार एकर मध्ये ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या खताचा वापर केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

एकाच दिवशी लावलेल्या या दोन्ही पिकांपैकी सेंद्रीय खत वापरलेला गहू या पिकाला आता मोठ्या लोंब्या पाहायला मिळत आहेत. रासायनिक प्रकारे पिकवलेल्या गव्हामध्ये अजूनही हा बदल झालेला नाही. डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी मोठ्या संशोधनानंतर जैनम चरखा आणि क्रांती हे प्रॉडक्ट बनवलंय.

अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी बनवलेलं हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे. सरकारनं याकडं विशेष लक्ष देऊन सबसिडी जाहीर करावी, अशी मागणी जैनम चरखाचे संचालक अनिल जैन यांनी केली.

 

कर्करोग मुक्त भारत करणे हा मुलभूत संकल्प करून डॉ. ए.एस चन्नीवाला यांनी अनेक वर्षाच्या अथक संशोधनातून सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. हे खत पिकास वापरल्या नंतर शेतकऱ्यांना युरिया, डि ए.पी पाण्यात विरघळणारे एन पी के,सुक्ष्म अन्नद्रव्ये,सल्फेट खते किंवा कोणतेही रासायनिक खत वापरण्याची गरज पडत नाही.

 

आपले पिक चांगल्या किमतीत विकायचे असेल किंवा रोगमुक्त राहायचे असेल तर हे खत योग्य आहे.मी चार एकर मध्ये हे खत वापरले आहे. फरक दिसून आला आहे.लवकरच गहू तयार होवून खाण्यासाठी वापर करणार असल्याचे सुभाष कागदे
(शेतकरी ,दसूर ता. माळशिरस) यांनी सांगितले.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Scientist #lost #loved #ones #cancer #discovers #organic #fertilizer #Malshiras #Research #Alchemy, #कॅन्सर #माणसं #गमावलेल्या #शास्त्रज्ञ #शोधले #सेंद्रीयखत #माळशिरस #संशोधन #किमया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Bhima Kesari सिंकदर शेख ठरला ‘भीमा केसरी’, मोहो॓ळमध्ये काढली मिरवणूक
Next Article पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?