Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शहीद संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप, आठवर्षीय मुलाकडून मुखाग्नी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

शहीद संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप, आठवर्षीय मुलाकडून मुखाग्नी

Surajya Digital
Last updated: 2020/11/23 at 6:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरच वीरपुत्र संग्राम पाटील यांना आज सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. निगवे खालास या त्यांच्या मूळगावी त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संग्राम पाटील यांच्या आठ वर्षांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमदार ऋतुराज पाटील संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते.

संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. 21 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. संग्राम पाटील यांच्या पश्चात आई-वडील, धाकटा भाऊ, धाकटी बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काबाडकष्ट करुन शिवाजी पाटील यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं. अतिशय हळवा आणि मनमिळावू असा संग्राम यांचा स्वभाव होता. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करुन संग्राम यांनी आपलं शरीर मजबूत केलं. प्रचंड कष्ट करण्याचं बाळकडू संग्राम यांना घरातूनच मिळालं.

* रिटायरनंतरच्या अनेक स्वप्न अधुरे

मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडे परतले नव्हते. फोनवरुनच घरातील सगळ्याची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्या आधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

* एक कोटीची घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे या दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकरकडून प्रत्येकी एक कोटी दिले जातील, अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

You Might Also Like

माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य

गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी

पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश

नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर

पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले

TAGGED: #शहीदसंग्रामपाटील #अखेरचानिरोप #आठवर्षीय #मुलाकडून #मुखाग्नी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती; आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ
Next Article रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश; पुन्हा सरकार पडण्याचे केले भाकीत

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?