पुणे : केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असूनदेखील चुका दुरुस्त करता आल्या नाहीत? तर त्यावर चर्चा काय करायची, असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांना यूपीए सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. पुण्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या शरद पवार यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रात गेली सहा वर्षे यांचे सरकार आहे. आमच्याकडून चुका झाल्या तर त्या सहा वर्षांत दुरुस्त का करता आल्या नाहीत, असा प्रश्न करत त्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार निशाणा साधला.
आधीच्या सरकारने या विषयावर केंद्रित केले असते तर सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा पडला नसता. आमच्यासारखा वैविध्यपूर्ण आणि प्रतिभावान देश इंधनासाठी आयातीवर इतका अवलंबून कसा राहू शकतो? असा प्रश्न करत पंतप्रधान मोदी यांनी इंधन दरवाढीचा ठपका पूर्वीच्या सरकारवर ठेवला होता.