Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: औरंगाबादचा जुना वाद पेटलाय, त्यात अहमदनगरच्या नामांतराची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

औरंगाबादचा जुना वाद पेटलाय, त्यात अहमदनगरच्या नामांतराची मागणी

Surajya Digital
Last updated: 2021/01/02 at 9:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अहमदनगर : औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची जुनी मागणीही शिवसेनेने पुढे आणली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी ही मागणी केली.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे.’ असे सांगत लोखंडे यांनी या जुन्या मागणीला हवा भरली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

औरंगाबादच्या नामांतराची विषय निघाला की अहमदगरचाही पुढे येतो. यावेळी हा पुढे आणण्यात शिवसेनेच्या शिर्डीच्या खासदाराने आघाडी घेतली आहे. नगरच्या महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे. तर शिवसेना विरोधात आहे. शहराचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत, खासदार भाजपचे आहेत. अशा वेगळ्या राजकीय समीकरणाचे राजकारण असल्याने नामांतराविषयी महानगरपालिकेची भूमिका काय, असेल हेही उत्सुकतेचे आहे. तर दुसरीकडे सरकार आणि सरकारमधील घटक पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. औरंगाबादच्या नामांतरास विरोध असल्याचे सांगणारे महसूलमंत्री थोरात हेही नगरचे आहेत. त्यामुळे नामांतरासंबंधी त्यांची आणि काँग्रेसची भूमिकाही महत्वाची आहे.

* भाजपकडून हवा भरण्यास सुरवात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे औरंगाबाद नामांतर मागणीला विरोधही दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होत असून भाजपच्या नेत्यांनी या प्रश्नात हवा भरण्यास सुरवात केली आहे.
औरंगाबादमध्ये हे सुरू असतानाच शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरच्या नामांतराची जुनीच मागणी पुढे आणली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांकडून अहमदनगरच्या नामांतराची मागणी सुरू आहे. अर्थात त्यावरून काहींमध्ये मतभेद आहे. काहींनी अंबिकानगर तर काहींनी आनंदनगर नाव सूचविले आहे. अंबिकानगर नाव देण्याची मागणी जुनी आहे. यावरून अनेकदा आंदोलनेही झाली आहे. नगरला पूर्वी भरलेल्या ७० व्या साहित्य संमेलनातही हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

* अहमदनगरचा इतिहास

पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ २८ मे १४९० या दिवशी मलिक अहमदने रोवली. त्याच्या नावावरून शहराला ‘अहमदनगर’ नाव देण्यात आले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #औरंगाबादचा #जुना #वाद #पेटलाय #अहमदनगर #नामांतराची #मागणी #खासदारलोखंडे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिला पोलिस उपनिरीक्षकाची भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Next Article सईकडून न्यूड फोटो शेअर करणा-या ‘वनिता’चे कौतुक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?