Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यातील दुकाने ८ वाजेपर्यंत सुरू राहणार : मुख्यमंत्री, सांगलीत घोषणा आणि स्टंटबाजी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

राज्यातील दुकाने ८ वाजेपर्यंत सुरू राहणार : मुख्यमंत्री, सांगलीत घोषणा आणि स्टंटबाजी

Surajya Digital
Last updated: 2021/08/02 at 3:58 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

सांगली : जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटी दिल्या. सोमवारी सकाळी त्यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी दरवर्षी येणाऱ्या महापूर आपत्ती व्यवस्थापनासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी तुमची साथ महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राज्यातील दुकानांची वेळ वाढवण्याचाही निर्णय घेतला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले. प्राधान्यक्रम जीवितहानी न होण्याला
मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळिये, चिपळूण, कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे.

तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच, आपल्याला नम्र विनंती आहे किती नुकसान झाले आहे त्याचे सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरे दारे एकूणच किती नुकसान झाले, याचा अंदाज घेणे सुरू आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील , आपली त्याला तयारी हवी. कारण दर वर्षी हे पूरांचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणारच, असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* राज्यातील दुकाने ८ वाजेपर्यंत सुरू राहणार : मुख्यमंत्री

राज्यातील ज्या जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे, त्या ठिकाणी दुकाने आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्येत वाढ होत आहे, त्याठिकाणी निर्बंध जैसे थे राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील दुकाने आठ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी मिळावी अशी मागणी होत होती. याबाबत आज आदेश देण्यात येतील. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढ होत आहे.

त्याठिकाणी मात्र निर्बंध जैसे थे राहणार आहेत. आगामी काही महिन्यात कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून याबाबत निर्बंध कठोर करण्याबाबत केंद्र सरकारने देखिल सूचना केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खासगी कार्यालयांनी देखील आपल्या वेळेत बदल करून गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गरज वाटल्यास 24 तास कार्यालय सुरू ठेवा मात्र गर्दी टाळा अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

* घोषणा आणि स्टंटबाजी

घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे काय, निवेदन द्या म्हणून मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांनी स्वतः हुन पुढाकार घेतला पण निवेदन देणे, मागण्या काय आहेत ते बोलण्यापेक्षा घोषणा आणि स्टंटबाजी करण्यात त्यांना वेळ घालवायचा होता. मुख्यमंत्र्यांनी सांगलीत प्रत्येक दोन फूट पाणी वाढल्यानंतर कुठल्या भागाचे किती नुकसान झाले याची आयर्विन पुलावर उभे राहून माहिती घेतली. प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तीला शासकीय मदत पोहोचली पाहिजे, पुनर्वसन बद्दल प्रशासनाची माहिती जाणून घेतली, व्यापारी आणि जनता यांच्याशी सुसंवाद करून पुढचा प्लॅन ठरवा असे आदेश दिले आणि व्यापारी व जनतेचे म्हणणे ऐकण्यासाठी ते बाजार पेठेच्या मध्यभागी पोहोचले होते.

व्यापारी आणि जनतेचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून भाजपने ही स्टंटबाजी केली. आणि वरून बोंब ठोकली. त्यांना स्टंट च करायचा होता. सांगलीकर जनता पूरग्रस्त आणि व्यापारी या सर्वांचा भाजपने अपमान केला आहे. मुख्यमंत्री उध्दव साहेब यांच्यापर्यंत जनतेचे म्हणणे पोहोचू नये असा त्यांचा डाव होता. त्यासाठीच त्यांनी हे नाटक केले त्या पापाचे माप जनता योग्य वेळी भाजपच्या पदरात घालणार आहे. शिवसेनेने हर भट रोड वर माईक सह सर्व व्यवस्था केली होती. व्यापारी आणि जनता मुख्यमंत्री उध्दव साहेबांच्या बरोबर सहज संवाद साधू शकवी आणि मुख्यमंत्र्यांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचावे याची व्यवस्था आम्ही केली होती. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सांगलीला वाऱ्यावर सोडले होते तर उध्दव जी एका निर्धाराने सांगलीत आले होते. त्यामुळे त्यांचे म्हणणे जनते पर्यंत पोहोचू नये आणि भाजप पक्षाच्या मुख्यमंत्री महोदयांनी काहीच केले नाही हे जनतेचे म्हणणे दृढ होऊ नये म्हणून भाजप तर्फे स्टंट करण्यात आला हे सांगलीची जनता आणि व्यापारी ओळखून आहेत. योग्य वेळी त्यांना जनता धडा शिकवेल.

* शंभूराज काटकर

शिवसेना उप जिल्हाप्रमुख, सांगली

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #Shops #state #remain #open #8pm #CM #Sangli, #राज्यातील #दुकाने #८वाजेपर्यंत #सुरू #मुख्यमंत्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article येथे किस कराल तर सावधान! आता ‘नो किसिंग झोन’
Next Article आता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?