Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री पांडुरंग कारखाना जिल्ह्यात एफआरपी रक्कम देणारा पहिला कारखाना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थशिवारसोलापूर

श्री पांडुरंग कारखाना जिल्ह्यात एफआरपी रक्कम देणारा पहिला कारखाना

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 9:27 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वेळापूर : सोलापूर जिल्ह्यातील एफ.आर.पी. ची रक्कम अदा करणारा पांडुरंग कारखाना पहिला कारखाना -ठरला आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम बँकेत वर्ग केली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची १४.४२ कोटी जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

कारखान्याचा ८ अॉक्टोबर रोजी बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याच्या इतिहासात सुधाकरपंत परिचारक यांच्या अनुपस्थित भावनिक वातावरणात झाला. त्यावेळी मोठे मालकांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारे कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उर्वरीत एफ.आर.पी. ची देय असणारी रक्कम २०६ रुपये/- प्रती मे. टन प्रमाणे दोन दिवसात देणार असल्याचे जाहीर केले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानुसार कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ७,००,१०० मे. टन ऊसाचे प्रती मे. टन रु . २०६ रुपये/- प्रमाणे र.रु.१४.४२ कोटी रक्कम बँकेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्यास पुरवठा केलेल्या ऊसास शासनाने जाहीर केलेल्या संपूर्ण एफ. आर .पी. ची प्रती मे. टन र.रु.२,५०६/- प्रमाणे रक्कम अदा केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम अदा करणारा श्री पांडुरंग हा कारखाना पहिला ठरला आहे.

गळीत हंगाम २०२०-२१ सुरु करण्याच्या दृष्टीने कारखान्यामधील कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम १५ अॉक्टोबरपासून सुरु केला जाणार आहे. या हंगामात कारखान्याकडे सुमारे १२ लाख मे.टन उसाच्या नोंदी असून त्यांचे गाळप कारखाना वेळेवर करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #पांडुरंगकारखाना #एफआरपी #देणारा #जिल्ह्यातील #पहिला #साखरकारखाना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिहार निवडणूक : महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंचा भाजपाकडून पत्ता कट
Next Article खूशखबर ! EPFO चे दिवाळी भेट, व्याजाचा पहिला हफ्ता दिवाळीपर्यंत मिळणार

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?