Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

Surajya Digital
Last updated: 2022/11/27 at 9:54 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ हजारो व्हराडी मंडळींची उपस्थितीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) □ यंदाच्या वर्षीच्या सोहळ्याची वैशिष्ट्ये □ शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करू : आ. देशमुख

□ हजारो व्हराडी मंडळींची उपस्थिती

सोलापूर : आज रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना…लगीन घाई सुरु… 40 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली… या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या. लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. Solapur. Subhash Deshmukh made silk knots tied by 40 couples at the Lokmangal wedding ceremony

माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी (ता. 27 नोव्हेंबर) विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थिती विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 40 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या.

सकाळी सर्व वधू- वरांना आ. सुभाष देशमुख यांनी समुपदेशन केले. वधू- वरांना मान्यवरांच्या हस्ते शालू, सफारी व रुखवत साहित्य देण्यात आले. विवाह सोहळ्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले होते. रक्तदान शिबिरही घेण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना भोजन देण्यात आले. मसाले भात, पोळी भाजी, भजी आणि मोतीचूर लाडू असा मेनू होता.

 

गेल्या दोन वर्षी कोरोनाकाळामुळे वधू-वरांची मिरवणूक काढली नव्हती. यंदा कोरोना संपल्यामुळे वधू-वरांची रिक्षातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले.

सायंकाळी गोरस मुहूर्तावर सुरवातीला बौद्ध पद्धतीने विवाह लावण्यात आला. त्यानंतर हिंदू रितीप्रमाणे उर्वरित विवाह पार पडले. यावेळी खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, रेणुक शिवाचार्य महाराज, पंचाक्षरी महास्वामी, आ. सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, बसवराज शात्री, ह. भ. प. शिवपुत्र स्वामी महाराज, ह. भ. प. ज्योतिराव चांगभले महाराज, ह. भ. प. विष्णुपंत मोरे महाराज, ह. भ. प. रमेश महाराज शिवपूरकर, ह. भ. प. बळीराम जांभळे महाराज, ह. भ. प. संजय केसरे, महाराज, ह. भ. प. अभिमन्यू डोंगरे महाराज, नरेंद्र काळे , अमर बिराजदार , गणेश चिवटे, सोमनाथ केंगनाळकर, सभापती गुरुसिद्ध मेह्त्रे, डॉ. चनगोंडा हवीनाळे, शशी थोरात, महेश देवकर, श्रीनिवास करली , भाजपचे दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन चव्हाण, मनिषा हुचे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ यंदाच्या वर्षीच्या सोहळ्याची वैशिष्ट्ये

16 वर्षात विवाह झालेल्या 2 हजार पेक्षा जास्त जोडप्यांना विशेष निमंत्रण देऊन पाचारण करून त्यांना आहेर देण्यात आला. लोकमंगल समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दालनात लोकमंगल समूहाच्या आजवरच्या कार्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन भरवण्यात आले होते. व्यासपीठावर भव्य कासवाची प्रतिकृती यंदाच्या समारंभातील काही वधूंचे कन्यादान लोकमंगलच्या देणगीदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मनकी बात हा कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. प्रेक्षकात बसून सुभाष देशमुख यांनीही कार्यक्रम पाहिला.

 

□ शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करू : आ. देशमुख

 

आपण या समाजात जन्मलो आहे. त्यामुळे समाजाचे ऋणी लागतो म्हणून लोकमंगल परिवार जनतेबरोबर आहे. लोकमंगलच्या या प्रयत्नाला सर्वांनी साथ द्यावी. सर्वांची साथ मिळाल्यास शेवटच्या माणसाचेही अश्रू पुसण्याचे काम आपण करू. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक होईल, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी विवाह सोहळ्याप्रसंगी केले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #SubhashDeshmukh #made #silk #knotstied #by40couples #Lokmangal #wedding #ceremony, #सोलापूर #लोकमंगल #विवाह #सोहळा #40जोडपे #बांधल्या #रेशीमगाठी #सुभाषदेशमुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article परखड आणि बंडखोर : विक्रम गोखलेंच्या एका विधानाने राजकीय क्षेत्रात उडाली होती खळबळ
Next Article विठ्ठल मंदिर दिसणार मुळ स्वरुपात; पाच टप्प्यात होणार काम, मुंबईत विशेष बैठक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?