Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या , महाराष्ट्रात इतक्या नद्या तरी पाणी प्रश्न’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या , महाराष्ट्रात इतक्या नद्या तरी पाणी प्रश्न’

Surajya Digital
Last updated: 2023/04/25 at 7:39 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

संभाजीनगर : दिल्लीत संसदेची नवीन इमारत लवकरच तयार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नव्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे आवाहन केले आहे. “Parliament Dr. Name Babasaheb Ambedkar, even if there are so many rivers in Maharashtra, water question KCR BRS Sambhajinagar ते छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बोलत होते. हैदराबाद येथील सचिवालयाला आम्ही बाबासाहेबांचे नाव दिले आहे, त्यांचा 125 फूट उंच पुतळा उभारला आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसची सभा पार पडली. यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पक्षप्रवेश केला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, आप असा प्रवास करीत हरिभाऊ आता बीआरएसमध्ये आले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांचे स्वागत केले आहे. चंद्रशेखर हे भारतभर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

छत्रपती संभाजीनगरच्या सभेत के चंद्रशेखर राव यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “शहरात आठ दिवसातून एकदा पाणी येते. महाराष्ट्रात इतक्या नद्या आहेत, पण आजही पाण्याची भीषण परिस्थिती आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असलेल्या राज्यात पिण्याचे पाणी देऊ शकत नाही? इतकी सरकारे बदलली तरी पाण्याचा प्रश्न तसाच आहे. कुणी अमेरिका-रशियावरून येणार नाही. लवकर जागे व्हा तरच आपला सुधार होईल,” असे ते म्हणाले.

 

नद्या वाहणाऱ्या राज्यात मी आलोय. या राज्यात दिवसाला दररोज सहा सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. पंतप्रधान काय करत आहेत. पाणी आणि वीज या दोन गोष्टी सर्वांनाच लागतात. जेवढे पाणी लागते त्याच्या दुप्पट पाणी भारतात आहे. मग वंचित का आहे. कारण मुख्यमंत्री, पंतप्रधान, नेत्यांची इच्छाशक्ती नाहीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला नकोत का, असा सवाल तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केला आहे.

 

Just copy #Telangana model as it is – CM KCR in Aurangabad

I’ll resign to my post if proven that the country doesn’t have enough coal reserves for next 100+ years

In TS posh Jubilee Hills to Gonds in Adilabad drink same water

Bring BRS to power in Maharashtra pic.twitter.com/Z5I72fcx6f

— Naveena (@TheNaveena) April 24, 2023

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

केसीआर यांनी महाराष्ट्रातील पाणी, वीज प्रश्नांवर आवाज उठविला. भारताला परिवर्तन करावे लागेल. एक पक्ष पडला, दुसरा जिंकला याला परिवर्तन नाही म्हणत. अनेक पक्षांना भारताने संधी दिलीय. भारताता जे परिवर्तन यायचे आहे, त्याशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही. यासाठीच बीआरएस पक्ष जन्माला आहे. बीआरएस एका धर्मासाठी, जातीसाठी आलेला नाही. सर्वांसाठी आहे. जेव्हा नवीन ताकद येऊ लागते तेव्हा जुन्या ताकदी एकत्र येऊन हल्ला करू लागतात. पोलिसांना मागे लावतात. घाबरायचे नाहीय. आपल्या लढ्यात नेकी आहे तर निश्चितच आपण विजयी होऊ, असे चंद्रशेखर राव म्हणाले.

 

पाण्याचा योग्य वापर करण्याची विद्या अनेक देशांनी आत्मसात केली आहे. यामुळे पाण्यासाठीचे नियोजन बदलायला हवे. महाराष्ट्रात बीआरएस सरकार बनवा, पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार. जसे माझ्या राज्यात झालेय. तिथे श्रीमंत व्यक्ती जे पाणी पितो ते गरीबातला गरीब देखील पितो, असे केसीआर म्हणाले.

दुसरी बाब म्हणजे वीज. का देत नाहीत मला माहिती नाही. आठ वर्षांपूर्वी तेलंगानातील वीजेची परिस्थिती वाईट होती. तिथे दिवसाला तीन तास वीज मिळायची. आज शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जातेय. नागरिकांना २४ तास वीज दिली जाते. तेलंगाना छोटे राज्य आहे, महाराष्ट्र मोठे आहे. काय होतेय. कोळसा हवा असतो. देशात एवढा कोळसा आहे की १५० वर्षे देशाला २४ तास वीज मिळेल. हे आकडे माझे नाहीत. खोटे ठरले तर मी आता राजीनामा देईन, असे आव्हान राव यांनी दिले आहे.

 

You Might Also Like

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

TAGGED: #Parliament #Name #BabasahebAmbedkar #many #rivers #Maharashtra #water #question #KCR #BRS #Sambhajinagar, #संसद #डॉबाबासाहेबआंबेडकर #नाव #महाराष्ट्र #इतक्या #नद्या #पाणी #प्रश्न #केसीआर #बीआरएस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मला मुख्यमंत्री व्हायचंय; नाना बोले मोदी है तो मुमकीन है !
Next Article डीसीसी बँकेमधील नुकसानीची जबाबदारी होणार निश्चित; पुणे विभागीय सहनिबंधकांनी दिले आदेश

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?