विष्णू सुरवसे सोलापूर :
सोलापूर, अक्कलकोट,दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांचे राजकीय केंद्र असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तथा मार्केट यार्डाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून या समितीत लोकनियुक्त सदस्य मंडळ प्रलंबित आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राजकीय रणनीती कशी असेल,याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. बाजार समितीसाठी 27 एप्रिल रोजी मतदान, तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग पाच वर्षे चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळणारे माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे शहर उतरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा बाजार समितीची निवडणूक लढवणार नाहीत असे सांगितले आहे.मात्र शेतकर्यांना मतदानाचा अधिकार मिळायला पाहिजे ही त्यांची मागणी मान्य झाल्यास ऐनवेळी ते निर्णय बदलूही शकतात.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवार 25 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकर्यांना मतदान नाही. सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि हमाल, तोलार, व्यापारी यांचे मतदान असणार आहे.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी हा महत्वाचा घटक असून देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकर्यांना मतदानाचा अधिकार दिला होता तोच अधिकार शेतकर्यांना पुनः देण्यात यावा अशी मागणी करणार आहे.यंदाच्या निवडणुकीत दिलेला अधिकार रद्द करून उमेदवाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकर्यांना दोन्ही संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणार आहे,असे आ.देशमुख यांनी सांगितले.
* सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उत्तर व दक्षिणचे प्राबल्य आहे.
दक्षिणमध्ये सुरेश हासापुरे,तर उत्तरमध्ये दिलीप माने यांचे प्राबल्य आहे.मागील सत्तेत एक वर्ष माजी आमदार दिलीप माने हे सभापती होते तर उर्वरित कालावधी आ.विजयकुमार देशमुख हे सभापती होते.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक निवडणूक वर दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूरचे प्रबल्य आहे.दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने ,काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे,राष्टˆवादी काँग्रेस श्रीशैल नरोळे, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,उत्तर मधील जेष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या वर्चस्व होते.मागील पंचवार्षिक निवडणूक मध्ये दिलीप माने यांचे पॅनल सत्ता काबीज केली व दोन वर्ष सभापती पद मिळाले.त्यानंतर कायदेशीर लढाई देत पदाचा त्याग करावा लागला.विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी उर्वरित दोन वर्ष पुढे सत्ता भोगली.
सहा महिने प्रशासकानंतर सहा वर्षानंतर निवडणूक प्रकियेस गती मिळाली आहे.सत्ता प्राप्त करण्यासाठी आजपासून रणनीती आखली जात असून काहींनी आपला पॅनल प्रमुख निवडण्यासाठी गाठीभेटी सुरू केली आहे.यंदाच्या बाजर समिती निवडणुकमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी,, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे,माजी आमदार तथा माजी चेअरमन दिलीप माने हे बाजार समितीच्या निवडणूकमध्ये उतरणार आहेत.सद्य स्थिती पाहता दिलीप माने हे काय भूमिका घेतली याकडे लक्ष लागले आहे.
सोन्याची अंडी देणारी संस्था आज कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.सोन्याची अंडी देणारी संस्था म्हणून मार्केट कमिटीकडे पाहिले जाते.त्यामुळे निवडणुकीच्या बोहल्यावर इच्छुक नवरदेवांची भाऊगर्दी असेल,असे जाणकार सांगतात.
सर्वपक्षीय सदस्यमंडळाची तयारी या निवडणुकीसाठी गाठीभेटी सुरू आहेत.सहका क्षेत्र असल्याने या निवडणुकीत राजकीय पक्ष चालत नाहीत तर पॅनेलवरच निवडणूक होईल.शक्यता बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी लवकरय सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचे माजी संचालक