Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरचा मृत्यू दर घटला; 10 टक्‍क्‍यांवरून आता 5.7 टक्क्यांवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूरचा मृत्यू दर घटला; 10 टक्‍क्‍यांवरून आता 5.7 टक्क्यांवर

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 7:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोलापूरचा मृत्यूदर 10 टक्क्यावरुन घटून आता 5.7 टक्क्यावर आला आहे. या विषयीची माहिती पालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांनी दिली आहे. वेग मंदावला असला तरी मुंबईपेक्षा सोलापूर शहराचा मृत्यूदर अधिक असल्याचे समोर येत आहे. यासाठी प्रशासनाला आणखी परिश्रम घेण्याची गरज आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.

राज्यातील इतर शहरांच्यामानाने सोलापूरचा कोरोना मृत्युदर सर्वाधिक होता. मात्र जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या प्रयत्नाला आता यश येताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी कोरोनाचा मृत्युदर 10 टक्क्यांवर गेला होता. आता कोरोनाचा मृत्युदर 5.7 टक्क्यांवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागांमध्ये रॅपिड अँटीजन चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर रुग्णावर उपचार करण्यासाठी सोयीस्कर होत आहे.

महानगरपालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्रातील को -मोरबीड लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. यात पाच ते सात टक्क्यांपर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सहज शक्य होत आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने केलेल्या नियोजनामुळे 24 तासात मृत पावणाऱ्यांचे प्रमाण हे 20 टक्क्यावरून पाच टक्क्यांवर आल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे.

अलगीकरण केंद्रातील सुविधा वाढविण्यात येणार असून उद्यापासून अलीगकरण केंद्रातल्या लोकांना गरम पाणी मिळणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे.

* भर पावसात शिबिरास भेट

आज शुक्रवारी भर पावसात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर, महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी भागातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेवक गुरुशांत धुतुरंगावकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या रॅपिड एजंट एस शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे भर पावसातसुद्धा नागरिकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला. शंभराहून अधिक चाचण्या यावेळी घेण्यात आल्या. त्यामध्ये एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. सभागृहनेते श्रीनिवास करली, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेविका अनिता कोंडी यांची उपस्थिती होती.

* सोलापूर शहराचा मृत्यूदर मुंबईपेक्षा अधिक

मुंबई शहरातील कोरोनाचा मृत्यूदर ५.६१ टक्के, पुण्याचा मृत्यूदर अडीच टक्के आहे. ठाणे शहराचा मृत्यूदर ३.३५ टक्के तर औरंगाबाद शहरातील मृत्यूदर ४.६३ टक्के आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या शहरातील स्थिती चिंताजनक होती. परंतु, या शहरांमधील मृत्यूदर घटत असल्याचे दिसते. सोलापूर शहरातील मृत्यूदर २२ जुलै रोजी ८.२१ टक्के आहे. मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर मानले जाते. मुंबईपेक्षा सोलापुरातील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #सोलापूर #मृत्यूदर #कोरोना #पालिकाआयुक्त #जिल्हाधिकारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीतील ‘तो’ वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय; पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी निर्णयाबद्दल व्यक्त केले समाधान
Next Article नान्नजमधून एक हजार ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे शरद पवारांना पाठविली

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?