सोलापूर, 7 मे (हिं.स.)।
यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक मिळवत 17 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर पंढरपूर पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय पुरस्कार पटकावत आठ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केली आहे.
2022-23 या कालावधीत झालेल्या पंचायत राज प्रशासनातील कामाचे मूल्यमापन करून या पुरस्काराची घोषणा केली आहे. याबद्दल ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर, कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.