Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काही लोकांच्या मनात भारतात नेपाळसारखे अराजक घडवण्याचा डाव – एकनाथ शिंदे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

काही लोकांच्या मनात भारतात नेपाळसारखे अराजक घडवण्याचा डाव – एकनाथ शिंदे

admin
Last updated: 2025/09/12 at 4:44 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर । नेपाळमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काही लोकांच्या मनात भारतात नेपाळसारखे अराजक घडवण्याचा डाव आहे. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीच्या दौऱ्यावर होते. शपथविधीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला होता. पत्रकारांनी याविषयी प्रश्न करताच शिंदे यांनी उत्तर देताना भारतात असे काहीही शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करणे फार दुर्दैवी आहे. प्रत्येकाला देशाप्रती स्वाभिमान, अभिमान असला पाहिजे. देशभक्त व देशावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारचे विधान करू शकत नाहीत. काही लोकांच्या मनात नेपाळसारखे अराजक किंवा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा डाव असू शकतो. त्यामुळे तसे कारस्थान कुणी रचत नाही ना ” असा प्रश्न उभा राहत आहे.

भारतीय लोकशाही पद्धती अत्यंत प्रगल्भ आहे. अतिशय मजबूत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान लिहिले. त्यामुळे भारतात अशा प्रकारची दुर्दैवी घटना कधीही होणे शक्य नाही. काही लोक आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्याचे काम करत आहेत. कारण, लोकशाहीमध्ये त्यांना जनतेच्या मतांमधून निवडून येता येत नाही. त्यामुळे त्यांची अशा प्रकारचा प्रयत्न करून पाहण्याची इच्छा आहे का? हा देखील विचार करण्याची आवश्यक्ता आहे. त्यामुळे देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असे शिंदे म्हणाले.

You Might Also Like

इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार – मुख्यमंत्री

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे याचे उत्तर सुशिक्षित नेत्यांनी द्यावे – भुजबळ
Next Article BH सीरिज वाहनधारकांसाठी सतर्कतेचा इशारा; कर थकल्यास वर्षाला ३६ हजार दंड

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?