Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्ली सोडली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्ली सोडली

Surajya Digital
Last updated: 2020/11/21 at 6:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आता काही दिवसांसाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाणार आहेत. त्यानुसार आता सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहायला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील. दुपारी चार वाजता दोघेही गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

राजधानी दिल्लीतील हवेचे प्रदुषण खूपच वाढले असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीला हवामान मानवणारे नाही. त्यामुळे त्यांना काही काळासाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

राजधानीतील हवा प्रदूषणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी काही दिवसांसाठी गोव्यात दाखल झाल्या. राहुलही त्यांच्यासोबत आहेत. ‘सोनिया यांना अस्थमाचा त्रास आहे. शिवाय, छातीत संसर्ग आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

डॉक्टरांनी त्यांना काही दिवस दिल्लीत न राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, त्या गोव्यात गेल्या असून, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारल्यानंतर त्या परत येतील,’ असे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

सोनिया गांधी यांनी गेल्या ऑगस्टमध्येच रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून तेव्हापासून त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यांच्या छातीत वारंवार संसर्ग होत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे सध्याच्या प्रदुषित हवेबद्दल डॉक्टरांनी त्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त करीत त्यांना काही दिवसांसाठी दिल्लीच्या बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते. याच काळात भाजपने संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, अशा महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी संसदेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #काँग्रेसअध्यक्षा #सोनियागांधी #राहुलगांधींनी #दिल्लीसोडली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वीज बिल 50 टक्के माफ होत नाही तोपर्यंत वीजबिल भरू नका : आठवले
Next Article कॉमेडियन भारती सिंगच्या घरात मिळाला गांजा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?