Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांना श्रीलंकेतील नेत्यांप्रमाणे पळून जावे लागेल, पडळकरांची टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांना श्रीलंकेतील नेत्यांप्रमाणे पळून जावे लागेल, पडळकरांची टीका

Surajya Digital
Last updated: 2022/09/06 at 8:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीत येणार आहेत. त्यासाठी आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी आहे. मी दोन वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार नाही, असे पडळकर म्हणाले आहेत. Sharad Pawar will have to flee like Sri Lankan leaders, Padalkar criticizes Baramati Pune

भाजपच्या ‘मिशन बारामती’ निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मागील विधानसभा निवडणुकीवेळी मी बारामतीतून उभा होतो, त्यावेळी माझे डीपॉझिट जप्त झाले. आज मेळाव्याला मोठी गर्दी आहेत, ही माणसे त्यावेळी कुठे गेली होती, असा  सवालही आ. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला.

2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांना पळून जावं लागणार असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

एखाद्याला फसवून घ्यायचं लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या. निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार देखील नसल्याचे पडळकर यांनी म्हटले.

या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा असेही पडळकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले. अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना यांना सत्तेत बसू द्यायचं नव्हतं. तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दुःख असल्याचे पडळकर यांनी म्हटले.

भारत- पाकिस्तान सामना जिंकल्यानंतर शरद पवार हात वर करतात. आता आरती करतानाचे व्हिडिओ त्यांना टाकावे लागतात, हेच भाजपचे यश आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडली, परंतु बावनकुळे ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मराठा ओबीसी आरक्षण आघाडी सरकारला देता आले नाही, परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर मिळाले, असे पडळकर यांनी यावेळी सांगितले.

 

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

TAGGED: #SharadPawar #flee #like #SriLankan #leaders #GopichandPadalkar #criticizes #Baramati #Pune, #शरदपवार #श्रीलंका #नेत्यांप्रमाणे #पळून #गोपीचंदपडळकर #टीका #मेळावा #बारामती #पुणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सावंतांची शिष्टाई : ठाकरेंना धक्का, आणखी एक नेत्या शिंदे गटाच्या मार्गावर
Next Article राज ठाकरेंनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन, झाली 40 मिनिटे चर्चा

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?