Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के

admin
Last updated: 2025/05/13 at 5:49 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, १३ मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी जाहीर झाला. राज्याचा निकाल ९४.१० टक्के इतका लागल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा एकूण २८ हजार ५१२ खासदी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेला राज्यातल्या ९ विभागीय मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्वांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.

सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.

राज्यात २३ हजार ४८९ माध्यमिक शाळांपैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागलेला आहे. मार्च २०२२ चा निकाल ९६.९४ टक्के होता. मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के होता. मार्च २४ चा निकाल ९५.८१ टक्के होता. या वर्षीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्यांनी कमी झाली आहेत.

You Might Also Like

‘पुढील २ दिवसांत बॉम्बस्फोट होईल’, महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल

पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले आदमपूर एअरबेसवर

पहलगामच्या दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर

केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद

ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही, शेतकऱ्यांना जुलैपासून विजबिल येणार -पालकमंत्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘पुढील २ दिवसांत बॉम्बस्फोट होईल’, महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल
Next Article crime प्रेमसंबंध अन् आर्थिक वादातून तरुणीची हत्या

Latest News

डॉ. वळसंगकर प्रकरण : २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती काहीच नाही
सोलापूर May 13, 2025
सोलापुरात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू
सोलापूर May 13, 2025
पाकिस्तानने मान्य केला ११ सैनिकांचा मृत्यू
देश - विदेश May 13, 2025
जम्मू-काश्मीर : लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा
देश - विदेश May 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच खासदार झाले – प्रणिती शिंदे
सोलापूर May 13, 2025
crime
प्रेमसंबंध अन् आर्थिक वादातून तरुणीची हत्या
देश - विदेश May 13, 2025
‘पुढील २ दिवसांत बॉम्बस्फोट होईल’, महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल
महाराष्ट्र May 13, 2025
निवृत्तीनंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत पोहचला प्रेमानंद महाराजच्या आश्रमात
देश - विदेश May 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?