Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली, आरोपींना अटकच करणे बंद करणार का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली, आरोपींना अटकच करणे बंद करणार का?

Surajya Digital
Last updated: 2021/05/08 at 7:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिथेच राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीत यापुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे निर्देश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले आहेत. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?’ असा सवाल केला आहे.

राज्यात लॉकडाऊन वाढणार का? राजेश टोपे काय म्हणाले, वाचा https://t.co/sahQkSHOME

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीत सध्या राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, यापुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे निर्देश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले आहेत.

चीनचे भरकटलेले २१ टन वजनाचे रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता https://t.co/3gyUm2lwSy

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

कारागृहांतील संख्या क्षमतेपेक्षा खूप अधिक आहे. अशा स्थितीमध्ये कोरोना संसर्ग झाला तर आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येईल हे लक्षात घेऊन अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे आदेश बजावण्यात आले आहेत.

यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.

◆अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला
◆ बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली! 1/3

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 8, 2021

या संदर्भात भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. “अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली!” असे आशिष शेलार म्हणाले.

◆कोरोनामुळे राज्यातील जेलमध्ये कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारगृह) यांनी डिजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा!

◆तीन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत!
2/3

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 8, 2021

शिवाय. “कोरोनामुळे राज्यातील जेलमध्ये कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारगृह) यांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा! तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.” असेही आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याचबरोबर, ” कोरोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?” असे सवाल सुद्धा आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केले आहेत.

●कोरोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत?

●कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?

◆ प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?
3/3

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 8, 2021

राज्यातील तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत.

* ११ हजार ६७९ कैदी अधिक

४६ कारागृहांची बंदिवान ठेवण्याची क्षमता २३ हजार २१७ एवढी असून सद्याच्या स्थितीमध्ये ३४ हजार ८९६ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा ११ हजार ६७९ कैदी अधिक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कारागृहात संसर्ग वाढू शकतो असे लक्षात आले असल्याने आरोपीची अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे निर्देशित करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत २ हजार ६६४ जणांना तातडीने पॅरोल मंजूर करण्यात आले होते.

सर्वाधिक कैदी पुणे येथील येरवडा कारागृहात असून या कारागृहाची क्षमता २४४९ असून सध्या या कारागृहात सहा हजार ८८ कैदी आहेत. अशीच स्थिती सातारा, कोल्हापूर , सांगली, सोलापूर, मुंबई, ठाणे, तळोजा, कल्याण येथील कारागृहांतील संख्या क्षमतेपेक्षा खूप अधिक आहे.

दुर्दैव ते किती? कोल्हापूरच्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू https://t.co/Knnci5de0S

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #state's #prisons #have #runout #capacity, #राज्यातील #तुरुंगात #कैदी #ठेवण्याची #क्षमतासंपली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात लॉकडाऊन वाढणार का? राजेश टोपे काय म्हणाले, वाचा
Next Article कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष : मागासवर्गाचे पदोन्नती आरक्षण रद्द, माजी मंत्री बडोलेंचा सरकारला इशारा

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?